शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या नातेवाइकांची तहान भागविण्यात मोठे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या या संकटात दाते हे कसल्या ना कसल्या मार्गे सेवा देत आहेत.. आपल्याकडील उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या या संकटात दाते हे कसल्या ना कसल्या मार्गे सेवा देत आहेत.. आपल्याकडील उपलब्ध साधनांचा सेवेसाठी कसा वापर करता येईल, याचे उत्तम उदाहरण समोर ठेवत आहेत. त्याच धर्तीवर विजय बागडे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत पाणी वाटप करून त्यांची तहान भागविण्याचे मोठे कार्य करीत आहेत. गरीब नातेवाइकांची तहान भागविण्यात मोठे समाधान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कोरोनाचा कहर सुरू झाला गेल्या वर्षी मार्चपासून. तेव्हापासून लोकांचे स्थलांतर सुरू झाले. अशा वेळी रस्त्यांनी हजारो किलोमीटर पायी चालणारे कुटुंबच्या कुंटुब विना पाण्याने बरेच अंतर कापत होते; मात्र अशा कुटुंबीयांना पाणी देण्यापासून विजय बागडे यांनी या सेवेला सुरुवात केली. असे कुटुंब ज्या ठिकाणीही थांबलेले असायचे त्यांना ते आपल्या मालवाहू गाडीत पाण्याची टाकी ठेवून त्याद्वारे त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचवत होते. अनेक वेळा तर मध्यरात्रीही त्यांनी अशा लोकांना त्यांच्या प्रवासात पुरेल ऐवढे पाणी दिले.

१३०० लीटर पाणी वाटप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इकरा या ठिकाणी एक १३०० लिटरची टाकी भरली की दिवसभरातून सकाळ, दुपार संध्याकाळ जावून घोषणा करून नातेवाइकांना पाणी देण्याचे काम विजय बागडे करीत आहेत. दिवसभरात १३०० लिटर पाणी वाटप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसभरात किती पाणी विकत घेणार!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांचे नातेवाईक गरीब, गरजू असतात. दिवसभर थांबायचे म्हटले तरी दिवसभरातून ते किती पाणी विकत घेतील...आधिच संकटात असलेल्यांना किमान पाणी देऊ शकलो तरी बस.. हा विचार मनात आला आणि गेल्या वर्षभरापासून तीन वेळा पाणी वाटप करून हजारो लोकांची तहान भागविली...माझा मुलगा कृणाल बागडे हा सोबत असतो.. असे विजय बागडे यांनी सांगितले.

पाण्यासोबत जागृतीही

मोफत पाणी देऊन नातेवाइकांची तहान भागविण्यासोबतच कोरोना हा कसा आजार आहे. त्यापासून तुम्ही कसे स्वत:चा बचाव करू शकता, याबाबत विजय बागडे यांनी वाहनावर ध्वनिक्षेपक बसविला असून, त्याद्वारे संदेशातून जनजागृतीही ते करीत आहेत. नातेवाइकांना गर्दी न करता व्यवस्थित रांगेत उभे करून ते पाणी वाटप करीत असतात. गेल्या दीड वर्षांपासून ही सेवा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.