शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळ्यात अतिपावसाने खरीप पिकाचे नुकसान झाले. मात्र जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगाम चांगला येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळ्यात अतिपावसाने खरीप पिकाचे नुकसान झाले. मात्र जास्त पाऊस झाल्याने रब्बी हंगाम चांगला येणार या आशेवर असताना शेतात गहू तरारलादेखील. मात्र आताही निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, अशी व्यथा चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील गहू उत्पादक शेतकरी नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात गुरुवार, १८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सात तालुक्यांमध्ये तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका बसला असून सर्वच ठिकाणी ३३ टक्केंच्यावर नुकसान झाले आहे. रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, चोपडा, एरंडोल, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमध्ये १४१ गावांमध्ये १३ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

सर्वाधिक गव्हाच्या पिकाला फटका

अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला आहे. तब्बल २००८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले. त्या खालोखाल मक्याचे ७१६ हेक्टर, ज्वारीचे ४०२ हेक्टर, हरभऱ्याचे २८४ हेक्टर, इतर पिके ४६ हेक्टर, बाजरीचे ३१ हेक्टर, कांद्याचे २५ हेक्टर तर केळीचे एक हेक्टर असे एकूण तीन हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील गहू उत्पादक शेतकरी नरेंद्र जाधव यांना खरीप हंगामात मोठा फटका बसला. मात्र अतिपवासामुळे पाणीसाठ्यात चांगले पाणी असल्याने रब्बीसाठी त्यांनी चांगलीच मेहनत घेत गव्हाची लागवड केली. आता गहू तरारला असतानाच अवकाळी पावपाचा फटका बसला व पाच चे सहा हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले.

तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका झालेले नुकसान

रावेर ३२

मुक्ताईनगर ४७

भडगाव ६८

चोपडा १२६

एरंडोल ६५०

अमळनेर २५३०

पारोळा १४०

एकूण ३५९३

पिकांचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)

तालुका गहू मका बाजरी ज्वारी कांदा हरभरा इतर केळी

रावेर २५ ६ — — — — — १

मुक्ताईनगर ४७ — — — — — — —

भडगाव ५० — २ १६ — — — —

चोपडा ५६ ३ — ६७ — — — —

एरंडोल ३३० १६५ १५ ११५ २५ — — —

अमळनेर १४४४ ५८६ — १८० — २८० ४० —

पारोळा ५६ ३६ १४ २४ — ४ ६ —

एकूण २००८ ७१६ ३१ ४०२ २५ २८४ ४६ १