शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धान्याची आवक आली १० ते १५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग वाढत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : खरीप हंगाम जसजसा जवळ येत आहे, तसतशी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग वाढत आहे. यामुळे घरात असलेले धान्य व इतर शेतीमाल विक्री करण्यासाठी धावपळ होत आहे. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने, या काळात धान्यविक्री पूर्णपणे होत नसल्याने, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक १० ते १५ टक्क्यांवर आली आहे. त्यात धान्याचे भावही कमी होत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून त्याचा मोठा परिणाम अजूनही जाणवत आहे. गेल्या वर्षी कडक लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांना चांगलीच झळ बसली. सप्टेंबर महिन्यानंतर स्थिती सुधारत असताना, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व व्यवसायांवर परिणाम होणे सुरू झाले. कोरोना नियंत्रणासाठी जनता कर्फ्यू, तीन दिवस कडक निर्बंध असे नियम घालून देण्यात आले. तरीही कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अखेर ‘ब्रेक द चेन’ लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने, दिवसभर काही ना काही खरेदीच्या नावाने नागरिक विनाकारण बाहेर फिरत असल्याची स्थिती होती. त्यामुळे अखेर अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते ११ या वेळेतच उघडी ठेवण्याची अट घालण्यात आली. यामध्ये बाजार समितीमध्येही याच वेळेत व्यवहार होत आहेत.

उशिरा आल्यास माल न्यावा लागतो परत

बाजार समितीतील व्यवहारांवरही वेळेच्या मर्यादा आल्याने ११ वाजेनंतर धान्य खरेदीही केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल सकाळी ११ वाजेनंतर आणल्यास त्यांना तो परत न्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी चार तासांत जेवढा माल खरेदी होईल, तेवढाच माल बाजार समितीमध्ये उपलब्ध राहत आहे. परिणामी, शेतकरीही सकाळी उशीर झाल्यास माल आणत नसून दुसऱ्या दिवशी तो आणतात. दररोज अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने आवकही घटत आहे.

शेतीकामासाठी पैशांची जमवाजमव

खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे घरात असलेला शेती माल विकणेही आवश्यक असल्याने, शेतकरी तो विक्रीचा प्रयत्न करीत आहे. त्यात दुकानांच्या वेळा मर्यादित असल्याने माल नेल्यानंतर जो भाव मिळेल, त्या भावात त्याची विक्री करीत आहे.

दररोज होणारी आवक (क्विंटलमध्ये)

धान्य आवक भाव

गहू १५० ते २०० १८०० ते २३००

ज्वारी ६४ १२०० ते २०००

दादर ५० १४०० ते २२००

लाल हरभरा २०० ४८०० ते ४९००

जाड हरभरा १०० ८६०० ते ८७००

शेतकरी काय म्हणतात?

खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे आता शेतीत वेळ देण्यासह पैसाही खर्च करावा लागणार आहे. घरात जे धान्य आहे, ते लवकर विक्री करावे लागणार आहे. मात्र, सध्या धान्याचे भाव कमी झाल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे.

- नामदेव चौधरी, शेतकरी.

घरात असलेला शेती माल विकायचा असला, तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे दुकानांच्या वेळेवर मर्यादा आल्या आहेत. सकाळी ११ नंतर मालाची खरेदी होत नाही. त्यामुळे सकाळी जो भाव मिळेल, त्या भावात माल विकायचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे.

- स्वप्निल जाधव, शेतकरी.

व्यापारी काय म्हणतात?

सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यात आता दुकानांच्या वेळा कमी असल्याने, कमी वेळेत अधिकाधिक माल खरेदीचे प्रयत्न असतात. त्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना माल विकणे गरजेचे असले, तरी वेळेमुळे जास्त माल येत नाहीये.

- सुनील वाणी, व्यापारी.

मालाची आवक कमी झाल्यास त्यांचे भाव वाढतात, तर आवक वाढल्यास भाव कमी होतात. मात्र, सध्या धान्याची आवक कमी असली, तरी त्यांचे भाव कमीच होत आहे. दुकानांच्या वेळा कमी असल्याने माल जास्त खरेदी होत नाही.

- अशोक राठी, व्यापारी.