शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारी काम... अजून किती दिवस थांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या पुलालगत असलेले विद्युत खांब काढण्यासाठी महापालिकेने दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. विद्युत खांब काढण्याचे काम जोपर्यंत लांबत जाईल तोपर्यंत पुलाचे काम देखील लांबणार आहे. त्यामुळे सरकारी काम.. पण आता अजून किती दिवस थांब असे म्हणायची वेळ आली आहे.

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झाले आहे. मात्र, मुदत संपल्यानंतर देखील हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या कामासाठी या पुलालगत असलेले महावितरणचे विद्युत खांब काढणे आवश्यक आहे. मात्र अनेक महिन्यांपासून निधी नसल्याने हे काम करण्यात न आल्याने हे काम रखडत जात आहे. महापालिका प्रशासनाला तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २५ कोटींचा निधीमधून शिल्लक असलेल्या तीन कोटींच्या निधीपैकी दीड कोटींच्या निधीतून हे काम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. याबाबत महापालिकेने ठरावदेखील झाला आहे. मात्र अद्यापही या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने हे काम रखडत जात आहे. या कामाला लागणारा निधीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आले असून, यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आमदार सुरेश भोळे व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा देखील समावेश आहे. या समितीने देखील या कामासाठी मंजुरी दिली असली तरी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची स्वाक्षरी झाली नसल्याने हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी याबाबत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून महापालिकेमार्फत हे काम केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

जितके काम रखडणार इतकेच पुलाचे काम थांबणार

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याआधीच विद्युत काम स्थलांतर करण्याच्या निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यात महावितरणनेदेखील आडमुठी भूमिका घेत निधी नसल्याचे कारण देत हे काम करण्याचे टाळले. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसीच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा निधी या विद्युत काम स्थलांतर करण्याबाबत मंजूर केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्याने हा निधीचा वापर होऊ शकला नाही. आता महापालिकेने दीड कोटी रुपयांची तरतूद या कामासाठी केली असतानादेखील, गेल्या चार महिन्यांपासून अद्यापही याबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. विद्युत खांब स्थलांतर करण्याचे काम जितके लांबेल तितकेच पुलाचे काम देखील लांबणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत खांब स्थलांतर करण्याच्या निर्णय मार्गी लावावा, अशी मागणी आता शिवाजीनगर भागासह जळगाव तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.