शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

ग्रामीण भागातूनही होऊ लागल्या मुली रफूचक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी ...

पाल, ता. रावेर : आपल्या कार्य-कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी चांगली वाढ झालीय, तशीच शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या व बऱ्याचदा चुकीचा निर्णय घेत बेजबाबदार तरुणासोबत पळून जात लग्न करणाऱ्या मुलींची संख्या ग्रामीण भागात वाढतच चालली आहे. यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

प्रेमविवाह हा तरुणाईला भुरळ घालणारा शब्द असून गेली दोन दशके तर प्रेमविवाहाचा इतका उदोउदो होतोय की, अनेक पालकांना ‘तुम्ही काय करता?’मुला मुलीवर लक्ष ठेवता येत नाही का? असा प्रश्न ऐकून घेण्याची वेळ येत आहे.

शाळा व कॉलेज तसे सोशल मीडिया

मुळे होणारी तरुण व तरुणींची भेट ही पालकांसाठी तापदायक ठरत आहे. प्रत्येकाच्या घरात हायटेक मोबाइल असल्याने दिवसभर बोलणे सुरू असते. आई किंवा वडिलांनी विचारले तर मुलगी सांगते की, मैत्रिणीशी बोलतेय.

मात्र तिकडून मित्र बोलत असतो.

आणि काही दिवसातच मुलगी घरातून गायब होते व लग्न करीत थेट पोलीस स्टेशनला हजर होते.

आणि पोलीस स्टेशनमध्ये पालकांनी कितीही

डोकं आपटूनही मुलीचे किंवा मुलाचे मन परिवर्तन होत नाही.

पोलिसांचेही या बाबतीत हात बांधले असतात. असे प्रकार खूपच होत आहेत.

पाल परिसरातही या दोन वर्षात अशा प्रकारे रफूचक्कर होत लग्न केल्याच्या दहा ते अकरा

घटना घडल्याने आता पालकवर्ग खूपच चिंताग्रस्त झाला आहे. बऱ्याचदा पालक मात्र बदनामीच्या भीतीने पोलिसातही जात नाही. आदिवासी बहुल परिसरातील पाल, आभोडा, निमड्या, मोरव्हाल या गावांमध्ये या घटना घडल्या आहेत.