शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

भूमी अभिलेख कार्यालयात सामान्यांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

भुसावळ : भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरपट थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी ...

भुसावळ : भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य नागरिकांची फरपट थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे शहराध्यक्ष नीलेश कोलते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शेती, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमीन मोजणी याशिवाय खरेदी-विक्री झालेल्या मालमत्तेचे फेरफार करण्यासाठी, नकाशा, उतारा, आखीव पत्रिका इत्यादी कागदपत्रे तसेच मोजणीसाठी व इतर प्रकरणांसाठी भूमी अभिलेख कार्यालयात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व व्यावसायिक मोजणी शुल्क भरतात. परंतु ही कामे ठरावीक कालावधीत पूर्ण होत नाहीत. भुसावळ उपविभागीय अधिकारी यांनी त्वरित या समस्येवर तोडगा काढावा.

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत. कारण अधिकारीसुद्धा नियमित येत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत आणि याचा फटका नागरिकांना बसत असून, रखडलेल्या प्रकरणांचा ताण वाढला आहे. या कार्यालयात अधिकारी नियमित उपस्थित राहत नसल्याने सर्वसामान्यांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्रात भूमी अभिलेख विभाग अद्ययावत व डिजिटायझेशनकडे वाटचाल करण्याच्या तयारीत असताना भुसावळ येथील कार्यालयात मात्र मोजणी, फेरफारसह प्रकरणे प्रलंबित असल्याने सामान्य नागरिकांची फरपट सुरू आहे. या सर्व प्रणाली नियमित वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना होणारा त्रास थांबला पाहिजे, ही नागरिकांची अपेक्षा आहे, असे नीलेश कोलते म्हणाले. या वेळी विवेक चौधरी, शेख वाजीद, हेमंत इंगळे, विशाल सुरवाडे, बबलू कोचुरे, अक्षय पाटील उपस्थित होते.