शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

जळगावात मिळालेल्या मानपत्राच्या काष्ठमंजुषाचा गांधींनी केला होता लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी जळगावच्या रेल्वेस्थानकावर तत्कालीन नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी हे मानपत्र ठेवण्यासाठी एक काष्ठमंजुषादेखील होती. त्या काष्ठमंजुषेचा गांधींनी जळगावच्या रेल्वेस्थानकावरच लिलाव केला होता आणि त्यातून खादी यात्रेसाठी निधी उभा केला होता. त्यासोबत त्यांनी शहादा येथून ३०० आणि दोंडाईचा येथून २०० रुपये संकलित केल्याचे यंग इंडियातील एका लेखातून समोर आले आहे. मात्र अशा मंजुषा लिलावाची सुरूवात त्यांनी जळगावलाच केली होती.

महात्मा गांधी हे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या या गुणांनुसार त्यांच्यावर सातत्याने संशोधन करण्यात आले आहे. मात्र देशकार्यासाठी निधी उभारणी करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. ही बाब फारशी उजेडात आलेली नाही. या अनुषंगाने फारसे संशोधनदेखील झालेले नाही. जळगावचे डॉ. अश्विन झाला यांनी गांधीजींच्या या अपरिचित पैलूंवर संशोधन केले आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.

२७ फेब्रुवारी १९२७ ला यंग इंडियात आलेल्या लेखानुसार गांधींनी जळगाव, शहादा, दोंडाईचा या ठिकाणाहूनदेखील निधी गोळा केला होता. या लेखातच लिहिले आहे की, ‘शहादासारख्या लहान गावातून एका मंजुषेला ३०० रुपये मिळाले तर दोंडाईचातदेखील एक तबकडी आणि अन्य वस्तूंना २०० रुपये मिळाले आहेत.’

गांधीजींच्या या दौऱ्यात सर्वच ठिकाणच्या मंजुषा लिलावात विकल्या होत्या. त्याची सुरुवात मात्र जळगावमधून झाली होती.

याबाबत जळगावमध्ये महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, ‘या वस्तूंचे एक कलात्मक मूल्य आहे. त्या गुजरात विद्यापीठाच्या संग्रहासाठी प्रा. मलकानी यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. मात्र त्यासोबतच अनेक वस्तू आहेत ज्या सोबत नेऊ शकत नाही. त्या वस्तूंची विक्री करणे हा एकच मार्ग आहे. असे नाही की मी प्रेमाने दिलेल्या वस्तूंचा अनादर करत आहे. हा पैसा त्या कामासाठी आहे जे मला प्रिय आहे. या मंजुषांचे पैसे करून मी त्या प्रेमाची परतफेड यथासंभव नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने करेन.’

सध्या महात्मा गांधी यांना दिलेल्या या मानपत्राची एक प्रत जळगावच्या महात्मा गांधी उद्यानात दगडात कोरलेली आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात ३०० पेक्षा जास्त वेळा निधी संकलित केला होता. त्याचा उपयोग त्यांनी विविध समाजोपयोगी कामांसाठी केला. त्यांना जळगावमध्ये विकलेल्या मंजुषेतून किती पैसे मिळाले होते किंवा ती कुणी घेतली होती हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.