शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जळगावात मिळालेल्या मानपत्राच्या काष्ठमंजुषाचा गांधींनी केला होता लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी ...

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी जळगावच्या रेल्वेस्थानकावर तत्कालीन नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी हे मानपत्र ठेवण्यासाठी एक काष्ठमंजुषादेखील होती. त्या काष्ठमंजुषेचा गांधींनी जळगावच्या रेल्वेस्थानकावरच लिलाव केला होता आणि त्यातून खादी यात्रेसाठी निधी उभा केला होता. त्यासोबत त्यांनी शहादा येथून ३०० आणि दोंडाईचा येथून २०० रुपये संकलित केल्याचे यंग इंडियातील एका लेखातून समोर आले आहे. मात्र अशा मंजुषा लिलावाची सुरूवात त्यांनी जळगावलाच केली होती.

महात्मा गांधी हे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या या गुणांनुसार त्यांच्यावर सातत्याने संशोधन करण्यात आले आहे. मात्र देशकार्यासाठी निधी उभारणी करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. ही बाब फारशी उजेडात आलेली नाही. या अनुषंगाने फारसे संशोधनदेखील झालेले नाही. जळगावचे डॉ. अश्विन झाला यांनी गांधीजींच्या या अपरिचित पैलूंवर संशोधन केले आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.

२७ फेब्रुवारी १९२७ ला यंग इंडियात आलेल्या लेखानुसार गांधींनी जळगाव, शहादा, दोंडाईचा या ठिकाणाहूनदेखील निधी गोळा केला होता. या लेखातच लिहिले आहे की, ‘शहादासारख्या लहान गावातून एका मंजुषेला ३०० रुपये मिळाले तर दोंडाईचातदेखील एक तबकडी आणि अन्य वस्तूंना २०० रुपये मिळाले आहेत.’

गांधीजींच्या या दौऱ्यात सर्वच ठिकाणच्या मंजुषा लिलावात विकल्या होत्या. त्याची सुरुवात मात्र जळगावमधून झाली होती.

याबाबत जळगावमध्ये महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, ‘या वस्तूंचे एक कलात्मक मूल्य आहे. त्या गुजरात विद्यापीठाच्या संग्रहासाठी प्रा. मलकानी यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. मात्र त्यासोबतच अनेक वस्तू आहेत ज्या सोबत नेऊ शकत नाही. त्या वस्तूंची विक्री करणे हा एकच मार्ग आहे. असे नाही की मी प्रेमाने दिलेल्या वस्तूंचा अनादर करत आहे. हा पैसा त्या कामासाठी आहे जे मला प्रिय आहे. या मंजुषांचे पैसे करून मी त्या प्रेमाची परतफेड यथासंभव नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने करेन.’

सध्या महात्मा गांधी यांना दिलेल्या या मानपत्राची एक प्रत जळगावच्या महात्मा गांधी उद्यानात दगडात कोरलेली आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात ३०० पेक्षा जास्त वेळा निधी संकलित केला होता. त्याचा उपयोग त्यांनी विविध समाजोपयोगी कामांसाठी केला. त्यांना जळगावमध्ये विकलेल्या मंजुषेतून किती पैसे मिळाले होते किंवा ती कुणी घेतली होती हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.