शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
3
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
4
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
5
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
6
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
7
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
8
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
9
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
10
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
11
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
12
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
13
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
14
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
16
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
17
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
18
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
19
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
20
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा

By admin | Updated: May 15, 2017 17:59 IST

संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 15 -  नळांना पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी  चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी सरपंचपतींना घेराव घालून  ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, पाटील वाडा, शिंपी गल्ली व मोमिन मोहल्यात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच दिवसांनी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला कळवूनदेखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.पाणी प्रश्नासाठी महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला मात्र सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांचे पती सचिन महाजन यांना घेराव घालत आपल्या समस्या मांडत संताप व्यक्त केला. मोर्चा ग्रामपंचायतीवर जात असल्याचे माहित पडताच काही ग्रा.पं. सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. तब्बल तासभर ग्रामपंचायत कार्यालयात गोधळ सुरू होता. ऐनवेळी माजी पंचायत समिती सभापती शेख ताहेर मन्यार, पंचायत समिती सदस्या अमिनाबी तडवी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत महाजन, शकिल्लोदीन शेख, चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले व सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणारप्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, मोमीन मोहल्ला, शिंपी गल्ली व पाटील वाडय़ात दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. यासाठी  तातडीची बैठक  घेणार असल्याचे आश्वासन सरपंचपती सचिन महाजन यांनी दिल्यानंतर  ग्रामस्थ व महिला माघारी परतल्या.