शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा

By admin | Updated: May 15, 2017 17:59 IST

संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमतअडावद, जि. जळगाव, दि. 15 -  नळांना पाणी येत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी  चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी सरपंचपतींना घेराव घालून  ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.गेल्या महिनाभरापासून पाणी पुरवठय़ाचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, पाटील वाडा, शिंपी गल्ली व मोमिन मोहल्यात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच दिवसांनी अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला कळवूनदेखील कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने आज महिलांसह नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.पाणी प्रश्नासाठी महिलांसह ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला मात्र सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य कुणीही उपस्थित नव्हते. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांचे पती सचिन महाजन यांना घेराव घालत आपल्या समस्या मांडत संताप व्यक्त केला. मोर्चा ग्रामपंचायतीवर जात असल्याचे माहित पडताच काही ग्रा.पं. सदस्य ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाही. तब्बल तासभर ग्रामपंचायत कार्यालयात गोधळ सुरू होता. ऐनवेळी माजी पंचायत समिती सभापती शेख ताहेर मन्यार, पंचायत समिती सदस्या अमिनाबी तडवी, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत महाजन, शकिल्लोदीन शेख, चंद्रकांत पाटील हे उपस्थित झाले व सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या.2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करणारप्रभाग क्रमांक 4 मधील नेहरु चौक, मोमीन मोहल्ला, शिंपी गल्ली व पाटील वाडय़ात दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. यासाठी  तातडीची बैठक  घेणार असल्याचे आश्वासन सरपंचपती सचिन महाजन यांनी दिल्यानंतर  ग्रामस्थ व महिला माघारी परतल्या.