शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वनविभागाने राजुरा येथे वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके फेकली उपटून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मुक्ताईनगरमधील राजुरा गावात वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके मारहाण करत उपटून फेकली व खोट्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुक्ताईनगरमधील राजुरा गावात वनदावेदारांच्या शेतातील उभी पिके मारहाण करत उपटून फेकली व खोट्या केसेस केल्या, असा दावा लोकसंघर्ष मोर्चाने केला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व आपद्ग्रस्तांनी शुक्रवारी जळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

वनक्षेत्रात पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या जमिनींवर त्यांचे दावे नियमित करण्यासाठी संसदेने १६ सप्टेंबर २००६ रोजी आदिवासी व वननिवासी यांच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे तो दूर करण्यासाठी वनहक्क कायदा पारित केला. या कायद्यांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा गावातील १४ शेतकऱ्यांनी आपले दावे दाखल केले आहेत. मात्र वनविभागाने वनपरिक्षेत्र वदोडा यांचे कार्यालय कुऱ्हा काकोडा येथील वनकर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांना धमक्या देत त्यांच्या शेतात बेकायदेशीर घुसत शेतात तिसऱ्यांदा पेरलेले उभे पीक उपटून नष्ट केले व त्यांच्यावर उलट शेतात घुसूनही ३५३ कलमाखाली केसेस दाखल केल्या.

वनविभागाच्या या अन्यायाविरोधात लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपटलेली पिके घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. यावेळी प्रतिभा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर या शेतकऱ्यांची बाजू मांडत या वनकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व ज्या दावेदारांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्या शेतात वनविभागाने कुठलीही आगळीक करू नये अन्यथा आम्हाला कोरोनाकाळातही तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत उपविभागीय वनहक्क तपासणी समितीमार्फत या शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.

अन्यथा मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने

प्रतिभा शिंदे यांनी, जर वनविभागाने वनदावेदारांना विनाकारण त्रास देणे थांबवले नाही तर आम्हाला पुन्हा कोरोनाचा विचार न करता मुंबई गाठत मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करावी लागतील, असे सांगितले.

वनविभागाचे अधिकारी म्हणतात...

वनविभागाची बाजू जाणून घेतली असता वडोदा वनक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी सांगितले की, वनपरिक्षेत्र हद्दीत राजुराच नव्हे तर अन्य कोणत्याही ठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी पीक उपटून फेकण्याची घटना घडलेली नाही व तशा प्रकारचा कोणताही वनगुन्हा दाखल झालेला नाही. वनदाव्यासाठी स्वतःहून गुन्हे दाखल करून घेण्यासाठी हा बनाव आहे. उलटअर्थी वनकर्मचाऱ्यांच्या वनगस्तीदरम्यान काही लोकांकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.