शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

पहिल्यांदा फुलले कमळ..!

By admin | Updated: October 20, 2014 09:56 IST

गेल्या ३५ वर्षांत ९ वेळा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सलगपणे निवडून येत असलेल्या सुरेशदादा जैन यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते.

जळगाव शहर विधानसभा निवडणूक २0१४

गेल्या ३५ वर्षांत ९ वेळा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून सलगपणे निवडून येत असलेल्या सुरेशदादा जैन यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. १९८0 ला काँग्रेस (आय)कडून सुरेशदादांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्यात काँग्रेस एसचे तुकाराम चौधरी यांना पराभूत करीत ते आमदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर १९८५ व १९९0 मध्ये रमेश चौधरी व ईश्‍वरलाल जैन या काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत केले. १९९५ मध्ये काँग्रेस(आय) कडून निवडणूक लढवित अपक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांना पराभूत केले. १९९६ व १९९९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवित काँग्रेस (आय)चे रवींद्र पाटील व डॉ.अर्जुन भंगाळे यांना पराभूत केले. २00२ व २00४ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित शिवसेनेचे प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा पराभव केला. तर २00९ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवित अपक्ष मनोज चौधरी यांचा पराभव केला. यापैकी केवळ १९८0 ला भाजपाचे गजानन जोशी हे उमेदवार होते. त्या वेळी त्यांना केवळ ९३८0 मते मिळाली होती. नंतर युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ असल्याने एकाही निवडणुकीत भाजपाचा उमेदवार नव्हता. त्यामुळे दर निवडणुकीत दादांच्या बाजूने पडणारे व्यापारिवर्गाचे मतदान यंदा विभागले गेले. त्यातच जळगाव शहर मतदारसंघ हा संपूर्ण शहराचा म्हणजेच मनपा क्षेत्रातील भाग आहे. मनपावरही सातत्याने आमदार सुरेशदादांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे विरोधकांनी दादांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी मनपाची कोंडी करण्याचा मार्ग अवलंबिला. घरकूल प्रकरणात सुरेशदादांना अडकविल्याने ते गेल्या अडीच वर्षांपासून शहराच्या, मतदारांच्या संपर्कात नव्हते. या कालावधीत मनपाची राज्य शासनाने जितकी आर्थिक कोंडी करता येणे शक्य होते, तितकी कोंडी केली. हुडको कर्ज फेडीसाठी गाळे करारासंदर्भात केलेले ठराव सातत्याने विखंडित करण्यात आले. त्यामुळे मनपाचा कर्जफेडीचा पर्याय खुंटला. विकासकामांचे प्रस्तावही राज्य स्तरावरच अडविले गेले. त्यात हुडकोकडून दबाव आणून मनपाची बँक खाती ऐन निवडणुकीच्या तोंडावर ५0 दिवस सील करण्यात आली. त्यामुळे मनपा कर्मचार्‍यांनीही संप पुकारला. परिणामी शहरातील रस्ते दुरुस्तीत झालेला अडथळा, घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण व्हावा व तो दादांच्या विरोधात मतपेटीत उतरावा यासाठी सोयीस्करपणे प्रयत्न झाले. दादा स्वत: उपस्थित असते तर चित्र वेगळे राहिले असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत विरोधकांची ही खेळी यशस्वी झाली व शहरात पहिल्यांदा कमळ फुलले आहे.