शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पहूर पेठ ग्रामपंचायतीचे ‘माझी वसुंधरा’अंतर्गत राज्यस्तरावर अंतिम मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:14 IST

गेल्या सहा महिन्यांपासून माझी वसुंधरा अभियान पेठ ग्रुप ग्रामपंचायत राबवित आहे. याअंतर्गत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा, तालुका ...

गेल्या सहा महिन्यांपासून माझी वसुंधरा अभियान पेठ ग्रुप ग्रामपंचायत राबवित आहे. याअंतर्गत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा, तालुका व उपविभागीय आयुक्तांच्या समितीने केली. यासाठी राज्यातून पात्र झालेल्या बारा ग्रामपंचायतींची निवड झाली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ७, तर जामनेर तालुक्यातून पहूर पेठ एकमेव ग्रामपंचायत स्पर्धेच्या अंतिम मूल्यांकनाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली. ग्रुप ग्रामपंचायत पेठचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरव उद्गार गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी काढून सादरीकरणावर प्रशंसा केली आहे.

व्हर्च्युअल टूरद्वारे मूल्यांकन

कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या समितीला प्रत्यक्ष पाहणी करता येणार नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार ‘व्हर्च्युअल टूर’द्वारे पहूर पेठ ग्रामपंचायतने राबविलेल्या अभियानाचे मूल्यांकन बारा ठिकाणी निश्चित करून सादरीकरण केले. सर्व प्रथम ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनी वसुंधरा अभियानाचे सादरीकरण करीत उत्कृष्ट मांडणी केली. यानंतर सेंद्रिय खतप्रकल्प, बायोगॅस, सौर ऊर्जा, रेन हार्वेस्टिंग, वृक्षलागवड, परस बाग, जीवनामृत,जलसंवर्धन, दुचाकी चार्जिंग पॉईंट याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण केले. यात राजधर पांढरे, शैलेश पाटील, शरद बेलपत्रे, किरण खैरनार, भारत पाटील, मनोज जोशी, शंकर भामेरे, संदीप बेढे, सचिन पाटील, जीवन पाटील व दीपक दौंगे यांनी समितीला ऑनलाइन ‘व्हर्च्युअल टूर’द्वारे कामांची मांडणी सादर केली.

समितीकडून मूल्यांकन

राज्य शासनाच्या वतीने विभागीय उपआयुक्त अरविंद मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. पाटील, ग्रामविकास यंत्रणा समिती यात ऑनलाइन सहभागी झाली, तर तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, अतिरिक्त गटविकास अधिकारी के. बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक पालवे, संजय बैरागी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण ठेवले. यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

===Photopath===

290521\29jal_8_29052021_12.jpg

===Caption===

पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ या अभियानसाठी राज्यस्तरीय सादरीकरण करताना निता पाटील, रामेश्वर पाटील, ज्योती कवडदेवी, डि. पी. टेमकर आदी.