शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

भाव घसरल्याने मोसंबी पडली ‘फिकी’

By admin | Updated: April 18, 2017 18:08 IST

मोसंबी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून फळांचे भाव यंदा घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा,दि.18- परिसरात मोसंबी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून दरवेळेस चांगले उत्पन्न देणा:या या फळांचे भाव यंदा घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

गाव व परिसरात सुमारे 500 हेक्टर शेत जमिनीत मोसंबी बागांची लागवड झालेली आहे तर सुमारे 200 हेक्टर शेत जमिनीत पेरू, सीताफळ, आवळा, डाळींबच्या बागा आहेत. कपाशी पिकापेक्षा मोसंबी बागा परवडतात असा अनुभव असल्याने शेतकरी राजा फलोत्पादनाकडे वळलेला आहे. यंदा मात्र द्राक्ष, टरबूज, आंबे आदी पिकांचे प्रचंड उत्पादन झाल्याने ते स्वस्त मिळत असल्याने मोसंबीची मागणी कमी झाल्याने भावही घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
रोपे लावल्यावर पाच वर्षाची प्रतीक्षा
60 रु. ची एक मोसंबी कलम नर्सरीत मिळते. 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट चे खड्डे करून त्यात खत व गाळ भरून कलम पावसाळ्यात लावतात. दरवर्षी दोन वेळा शेणखत टाकतात. उन्हाळ्यात बरेच शेतकरी टँकरने विकतचे पाणी ठिबक संचाद्वारे झाडांना पुरवितात. एका हेक्टर क्षेत्रात सुमारे 277 मोसंबीची झाडे लावली जातात. सुमारे पाच वर्षानंतर फळबहार यावयसा सुरुवात होते. साधारण मृगबहार व आंबेबहार असे दोन बहार येतात. बहुतेक शेतकरी आंबेबहार घेतात. बाग लावल्यानंतर 15 ते 20 वर्षे त्यातून फळे घेता येतात.
अनुदानाच्या अडचणी
मागील वर्षाचे मोसंबी अनुदान शासनाने मंजूर केले मात्र ते अद्याप मिळालेले नाही. वाढत्या उन्हाच्या चटक्यावर विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याअभावी मागील वर्षी 100 हेक्टर मोसंबी झाडांची तोड झाली होती. त्या जागी पुन्हा रोप लावण्यात आले. या कमी पाण्यात ते कसे जगवावे असा प्रश्न बळीराजा विचारत आहे. शेततळ्यांसाठी काही सधन शेतकरी तयार होतात मात्र खोदकाम व प्लास्टीक कागदावर निम्मेच अनुदान मिळत असल्याने इच्छा असून नाराजी व्यक्त करतात. कमी पाण्यात झाडे वाचविण्यासाठी अनुदानावर काही योजना होत्या त्या आज नसल्याने झाडे कशी वाचवावी या चिंतेत बळीराजा आहे.
उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत
परिसरात वाणेगाव, राजुरी, गहूते, साव्रे, पिंप्री, अटलगव्हाण, घोडसगाव, सातगाव, धाकडेगाव असे लघु पाटबंधारे आहेत. पावसाळा कमी जास्त होतो. तसेच उतावळी नदीवर मेणगाव - कोल्हे - पिंप्री अशी तीन पाटबंधारे असल्याने काही भरतात तर काही रिकामेच असतात. ठिबक संचाच वापर करून शेतकरी झाडे वाचवितात. तापीचे पाणी पिंपळगाव - पाचोरा परिसरात आणून ही धरणे भरल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल असे जाणकारांचे मत आहे.