शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

भाव घसरल्याने मोसंबी पडली ‘फिकी’

By admin | Updated: April 18, 2017 18:08 IST

मोसंबी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून फळांचे भाव यंदा घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

 पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा,दि.18- परिसरात मोसंबी उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होत असून दरवेळेस चांगले उत्पन्न देणा:या या फळांचे भाव यंदा घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. 

गाव व परिसरात सुमारे 500 हेक्टर शेत जमिनीत मोसंबी बागांची लागवड झालेली आहे तर सुमारे 200 हेक्टर शेत जमिनीत पेरू, सीताफळ, आवळा, डाळींबच्या बागा आहेत. कपाशी पिकापेक्षा मोसंबी बागा परवडतात असा अनुभव असल्याने शेतकरी राजा फलोत्पादनाकडे वळलेला आहे. यंदा मात्र द्राक्ष, टरबूज, आंबे आदी पिकांचे प्रचंड उत्पादन झाल्याने ते स्वस्त मिळत असल्याने मोसंबीची मागणी कमी झाल्याने भावही घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
रोपे लावल्यावर पाच वर्षाची प्रतीक्षा
60 रु. ची एक मोसंबी कलम नर्सरीत मिळते. 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट चे खड्डे करून त्यात खत व गाळ भरून कलम पावसाळ्यात लावतात. दरवर्षी दोन वेळा शेणखत टाकतात. उन्हाळ्यात बरेच शेतकरी टँकरने विकतचे पाणी ठिबक संचाद्वारे झाडांना पुरवितात. एका हेक्टर क्षेत्रात सुमारे 277 मोसंबीची झाडे लावली जातात. सुमारे पाच वर्षानंतर फळबहार यावयसा सुरुवात होते. साधारण मृगबहार व आंबेबहार असे दोन बहार येतात. बहुतेक शेतकरी आंबेबहार घेतात. बाग लावल्यानंतर 15 ते 20 वर्षे त्यातून फळे घेता येतात.
अनुदानाच्या अडचणी
मागील वर्षाचे मोसंबी अनुदान शासनाने मंजूर केले मात्र ते अद्याप मिळालेले नाही. वाढत्या उन्हाच्या चटक्यावर विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पाण्याअभावी मागील वर्षी 100 हेक्टर मोसंबी झाडांची तोड झाली होती. त्या जागी पुन्हा रोप लावण्यात आले. या कमी पाण्यात ते कसे जगवावे असा प्रश्न बळीराजा विचारत आहे. शेततळ्यांसाठी काही सधन शेतकरी तयार होतात मात्र खोदकाम व प्लास्टीक कागदावर निम्मेच अनुदान मिळत असल्याने इच्छा असून नाराजी व्यक्त करतात. कमी पाण्यात झाडे वाचविण्यासाठी अनुदानावर काही योजना होत्या त्या आज नसल्याने झाडे कशी वाचवावी या चिंतेत बळीराजा आहे.
उन्हाळ्यात पाण्यासाठी कसरत
परिसरात वाणेगाव, राजुरी, गहूते, साव्रे, पिंप्री, अटलगव्हाण, घोडसगाव, सातगाव, धाकडेगाव असे लघु पाटबंधारे आहेत. पावसाळा कमी जास्त होतो. तसेच उतावळी नदीवर मेणगाव - कोल्हे - पिंप्री अशी तीन पाटबंधारे असल्याने काही भरतात तर काही रिकामेच असतात. ठिबक संचाच वापर करून शेतकरी झाडे वाचवितात. तापीचे पाणी पिंपळगाव - पाचोरा परिसरात आणून ही धरणे भरल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल असे जाणकारांचे मत आहे.