शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

माऊलीच्या वारीत मिळते स्वर्गसुखाची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव माऊलीच्या वारीत मिळते स्वर्गसुखाची अनुभूती जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव लोकमत न्यूज ...

जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव

माऊलीच्या वारीत मिळते स्वर्गसुखाची अनुभूती

जामनेरच्या रमेश पाटलांचे पायी वारीचे अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर : पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीत चालताना कोणताही थकवा जाणवत नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ असते. त्यामुळे अभंग, हरिपाठ व मुक्ताई ताटीचे अभंग म्हणत पंढरपूर केव्हा येते हेच कळत नाही. स्वर्गसुखाचा अनुभव म्हणतात तो फक्त माऊलीच्या वारीतच अनुभवता येतो, अशी आठवण येथील रमेश उर्फ भाऊराव शामराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.

पाटील नगारखाना भागातील रहिवासी असून १९९९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंढरपूरची पायी वारी केली.

वारकरी पंथाचे अनुयायी असून जामनेर येथील गोविंद महाराज संस्थानचा कारभार त्यांनी सांभाळला. पंढरपूरच्या वारीत त्यांना पत्नी विमलबाईंची साथ लाभली. आजही हे दाम्पत्य नित्य हरिपाठ करतात.

मेहूण येथील आदिशक्ती मुक्ताईची पालखी गेल्या अनेक वर्षांपासून जामनेरमार्गे पंढरपूरला जाते.

दिंडी व वारकऱ्यांचे पुरा भागात आगमन व मुक्काम असतो. दुसऱ्या दिवशी दत्त मंदिरात प्रवचन, किशोर दत्तात्रय पाटील यांच्या घरी माऊलींच्या पादुकांचे पूजन व अभिषेक केला जातो. त्यांच्याकडून वारकऱ्यांना भोजन प्रसाद दिला जातो. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दुर्दैवाने कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात खंड पडला आहे.

रमेश पाटील हे शांताराम लक्ष्मण पाटील व नामदेव धनगर यांच्यासोबत जामनेर येथून पायी वारीत सहभागी झाले. पायी वारीचा अनुभव सांगताना त्यांनी विठ्ठल दर्शनाची लागलेली ओढ सांगितली. साडे पाचशे किलोमीटरचा प्रवास १ महिना १० दिवसांत पूर्ण केला. जामनेर येथून निघतांना अवघे १२ ते १५ वारकरी होतो. वाटेत वारकरी दिंडीत सहभागी होऊ लागले. दिंडी मार्गातील गावात स्थानिक भाविकांकडून चहापान, भोजन आदींची व्यवस्था केली जाते. आधी मार्गातील गावात जेथे मुक्काम ठरलेला असतो त्या ठिकाणी पत्राद्वारे कळविले जायचे. आता मोबाईलची व्यवस्था झाल्याने मोबाईलवरून संदेश दिला जातो. मेहुणचे सुधाकर महाराज यांच्या सोबत वारीत सहभागी होऊन विठ्ठल दर्शनाचा आनंद घेता आला.

बार्शी येथे भगवान मंदिरात मुक्काम व नंतर सात दिवसांनी आषाढ शुद्ध अष्टमीला पंढरपूरला पोहोचलो. नवमीला विश्रांती व दशमीला रात्री पंढरपूरला पोहोचलो. चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाचे दर्शन, अमळनेरात सखाराम महाराज, गोविंद महाराज यांच्या समाधींचे दर्शन, लोहकुंडात अभिषेक केल्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर वारी पूर्ण केल्याची अनुभूती मिळाली.

-------------------------------------------------

कळस दर्शनानेही मिळते पुण्य

कळसाचे दर्शन घेऊनही वारीचे पुण्य मिळते.

देव जळी स्थळी भरला,

ठाव कोठे नाही उरला

आज इच्छा असूनही प्रकृती साथ देत नसल्याने माऊलीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखविली. पायी वारीनंतर पाच वेळा आळंदी पर्यंत एसटीने व त्यापुढे पायी वारी पत्नी विमलबाई सोबत केल्याचे त्यांनी सांगितले. काही कारणाने ज्यांना पंढरपूरला जाऊन विठू रायाचे दर्शन घेणे शक्य होत नाही त्यांनी आपल्या गावातीलच मंदिरात दर्शन घेऊन पुण्य मिळवावे असेही त्यांनी सांगितले.

------------------------------------------------