शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नवीन कृषी कायद्याचा समर्थनासाठी कृषक समाज सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन कृषी कायद्याविषयी अजूनही शेतकऱ्यांचा मनात गैरसमज असून, हे गैरसमज काढण्यासाठी राज्य कृषक समाजाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती भारत कृषी समाजाचे राज्याचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर यांनी मंगळवारी कृषक समाजाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी प्रगतिशील शेतकरी वसंतराव महाजन, जगतराव पाटील, ॲड. फोकमारे आदी उपस्थित होते.

डॉ. मानकर यांनी सांगितले की, नवीन कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असून, याबाबत काही जणांकडून चुकीचे गैरसमज पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल बाजार समितीबाहेरदेखील विक्री करण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी आपला माल शेतकरी देऊ शकतात. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या त्रुटींबाबतचे बदल शेतकऱ्यांनी सुचवावेत; मात्र हा कायदा रद्द करणे चुकीचे असून, शेतकऱ्यांमधील गैरसमज दूर करण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मानकर यांनी दिली.