शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

By admin | Updated: May 7, 2014 01:46 IST

तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

धरणगाव : तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. या सर्व वंचित शेतकर्‍यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी कार्यालयावर धडक देऊन कृषी अधिकार्‍यांना घेराव घातला व संतप्त भावना व्यक्त करीत पुरवणी यादी तयार करण्याची मागणी केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोन दिवस तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. शेकडो हेक्टरातील पिके जमीनदोस्त झाली. गहू, हरभरा, मका, कापूस आदी पिके भुईसपाट झाली. यानंतर शेतकर्‍यांच्या मागणीवरून नुकसानीचे पंचनामे झाले. शेकडो हेक्टरात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी शासनाकडे सादर केला होता. झालेल्या पंचनाम्यानंतर शासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत अनेकांची नावे नसल्याचे नंतर उघडकीस आल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला होता. आता मदतीच्या याद्या प्राप्त होऊ लागल्याने कृषी व महसूल विभागाने केलेली गडबड समोर येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी धारेवर या वेळी पी.सी. पाटील यांनी या विषयावरून कृषी कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले व जर तुम्ही न्याय देणार नसाल तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला. या वेळी तहसीलदारांकडे पुरवणी यादी पाठविण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिले. धरणगाव तालुक्यातील ५२ गावांमध्ये गारपीट झाल्याने कृषी विभागातर्फे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार पंचनामे झाल्याने शेतकर्‍यांना मदत मिळत आहे. मात्र पंचनामा करताना कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी काही शेतकर्‍यांना डावलल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांवर अन्याय हा आकडा तीन ते चार हजार शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे पी.सी. पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांना शेतकर्‍यांसमवेत घेराव घालून व्यथा मांडल्या. नुकसानीची सविस्तर माहिती त्यांना सुपूर्द केली व वंचित शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली. या वेळी वंजारी, पष्टाणे, भवरखेडा, शामखेडा व इतर गावांचे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)