शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

By admin | Updated: May 7, 2014 01:46 IST

तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत.

कृषी अधिकार्‍यांना घेराव शेतकर्‍यांचा संताप : मदतीसाठी एकवटले...

धरणगाव : तालुक्यातील ५२ गारपीटग्रस्त गावांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार शेतकर्‍यांच्या शेतीचा पंचनामा न झाल्यामुळे ते शासकीय मदतीपासून वंचित राहिले आहेत. या सर्व वंचित शेतकर्‍यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी कार्यालयावर धडक देऊन कृषी अधिकार्‍यांना घेराव घातला व संतप्त भावना व्यक्त करीत पुरवणी यादी तयार करण्याची मागणी केली. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोन दिवस तालुक्यात वादळी वारा व अवकाळी पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. शेकडो हेक्टरातील पिके जमीनदोस्त झाली. गहू, हरभरा, मका, कापूस आदी पिके भुईसपाट झाली. यानंतर शेतकर्‍यांच्या मागणीवरून नुकसानीचे पंचनामे झाले. शेकडो हेक्टरात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसल्याचा अहवाल महसूल व कृषी विभागाच्या पथकांनी शासनाकडे सादर केला होता. झालेल्या पंचनाम्यानंतर शासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत अनेकांची नावे नसल्याचे नंतर उघडकीस आल्याने शेतकरीवर्ग संतप्त झाला होता. आता मदतीच्या याद्या प्राप्त होऊ लागल्याने कृषी व महसूल विभागाने केलेली गडबड समोर येत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात कमालीचे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकारी धारेवर या वेळी पी.सी. पाटील यांनी या विषयावरून कृषी कर्मचार्‍यांना चांगलेच धारेवर धरले व जर तुम्ही न्याय देणार नसाल तर आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला. या वेळी तहसीलदारांकडे पुरवणी यादी पाठविण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिले. धरणगाव तालुक्यातील ५२ गावांमध्ये गारपीट झाल्याने कृषी विभागातर्फे पंचनामे करण्यात येऊन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार पंचनामे झाल्याने शेतकर्‍यांना मदत मिळत आहे. मात्र पंचनामा करताना कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी काही शेतकर्‍यांना डावलल्याच्या तक्रारी आहेत. अनेकांवर अन्याय हा आकडा तीन ते चार हजार शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे पी.सी. पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांना शेतकर्‍यांसमवेत घेराव घालून व्यथा मांडल्या. नुकसानीची सविस्तर माहिती त्यांना सुपूर्द केली व वंचित शेतकर्‍यांना न्याय देण्याची मागणी केली. या वेळी वंजारी, पष्टाणे, भवरखेडा, शामखेडा व इतर गावांचे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)