शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ...

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नागरिक तसेच व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसला असून धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

भाजीपालादेखील कवडीमोल भावात विकला जात असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड बसत आहे. उडीद मूग, ज्वारी या सारख्या पिकांवर पाणी जास्त झाल्याने शेतातच त्यांना कोंब झाडावरच आले आहेत. धरणगाव तालुक्यात विक्रमी पावसाने कपाशीची लागवड जास्त असल्याने कपाशीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. तालुक्यात ९० हजार हेक्टरी कपाशी लागवड करण्यात येत असून जास्त प्रमाणात हे पीक घेतले जाते. पावसाने हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे कर्ज घेऊन किंवा सावकारांचे कर्ज घेऊन लागवड केली. मात्र, हा पैसाही वाया गेला आहे. सोसायट्यांकडून घेण्यात आलेले कर्जही माफ केले जावे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

---

वार्तापत्र कल्पेश महाजन