शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना ...

शहरासह तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आले असून या सततच्या पावसामुळे तालुका आता ओल्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. नागरिक तसेच व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड बसला असून धरणगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

भाजीपालादेखील कवडीमोल भावात विकला जात असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड बसत आहे. उडीद मूग, ज्वारी या सारख्या पिकांवर पाणी जास्त झाल्याने शेतातच त्यांना कोंब झाडावरच आले आहेत. धरणगाव तालुक्यात विक्रमी पावसाने कपाशीची लागवड जास्त असल्याने कपाशीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले दिसून येते. तालुक्यात ९० हजार हेक्टरी कपाशी लागवड करण्यात येत असून जास्त प्रमाणात हे पीक घेतले जाते. पावसाने हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांचे कर्ज घेऊन किंवा सावकारांचे कर्ज घेऊन लागवड केली. मात्र, हा पैसाही वाया गेला आहे. सोसायट्यांकडून घेण्यात आलेले कर्जही माफ केले जावे, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

---

वार्तापत्र कल्पेश महाजन