शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

एसटीचा श्रावणात शिमगा दुसरा महिना संपत आला असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:20 IST

जळगाव : गेल्यावर्षी कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाल्यामुळे, अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. आता दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पुन्हा ...

जळगाव : गेल्यावर्षी कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाल्यामुळे, अनेक महिने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. आता दुसऱ्या लाटेनंतर बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली असली तरी अपेक्षित उत्पन्न येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारापुरतेही महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यामुळे ऑगस्ट महिना संपण्यात येत असतानाही जुलै महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा मार्च ते मेपर्यंत एसटी महामंडळाची सेवा पूर्णत: बंद होती. त्यामुळे या काळात एसटी महामंडळाचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले. मात्र, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, जूनपासून शासनाने टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर तेव्हापासून महामंडळाची सेवाही टप्प्याटप्प्याने पूर्ववत झाली आहे. राज्यासह परराज्यातही बससेवा सोडण्यात येत आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने अद्यापही नागरिक बाहेरगावी जाणे टाळत असल्यामुळे, महामंडळाला पूर्वीप्रमाणे अपेक्षित असलेले दैनंदिनही उत्पन्नही मिळेनासे झाले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांचा पगारावर झाला असून, ऑगस्ट महिना संपण्यात येत असतानाही कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उसनवारीने आणि व्याजाने पैसे मागण्याची वेळ आली आहे.

इन्फो :

उसनवारी तरी किती करायची?

एसटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून पगार कमी आहेत. त्यामुळे माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी घरासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी व इतर कारणासाठी बॅंकांचे, सोसायट्यांचे कर्ज काढलेले आहेत. आता दर महिन्याला पगारातून हे हप्ते कट होतात. मात्र, आता जुलै महिन्याचा पगार न झाल्यामुळे घराचा हप्ता मी मित्राकडून उसनवारीने पैसे घेऊन बॅंकेत भरला.

एसटी कर्मचारी.

मुलीच्या लग्नसाठी एका पतसंस्थेकडून कर्ज घेतले आहे. दर महिन्याला पगार झाल्यामुळे या पतसंस्थेत पैसे भरत असतो. मात्र, जुलैचा पगार न झाल्यामुळे एका नातलगाकडून पैसे घेऊन या कर्जाचा हप्ता भरला. गेल्या वर्षीदेखील अनेक महिने पगार रखडल्यामुळे खूप हाल झाले. सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी काहीतरी तोडगा काढायला हवा.

एसटी कर्मचारी

इन्फो :

उत्पन्न कमी, खर्च जास्त

- कोरोनाकाळात एसटी महामंडळाची मोठ्या प्रमाणावर बससेवा बंद असल्यामुळे उत्पन्न बुडाले. त्यानंतर बससेवा नियमित सुरू होऊनही अपेक्षित प्रवासी मिळत नसल्यामुळे डिझेलचा खर्चही निघत नाही. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असा प्रकार होत आहे.

- महामंडळातर्फे अनलॉकनंतर राज्यासह परराज्यातही बससेवा नियमित सुरू केली आहे. मात्र, या मार्गांवरही मंहामंडळाला प्रवासी मिळत नसून, रिकाम्या बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर त्या दिवसाचा चालक-वाहकाचा पगार आणि डिझेलवरही खर्च होत आहे.

- तसेच शहरासह अनेक ग्रामीण भागातील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे, परिणामी बसच्या मेंटेनन्स मोठा खर्च वाढला आहे. तसेच टायरांचा घसारा होऊन, मोेठे आर्थिक नुकसान होत आहे.

इन्फो :

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाकडे पाठपुरावा सुरूच आहे. तसेच सध्या महामंडळाची सेवा सर्व मार्गावर सुरू झाली असली तरी काही मार्गांवर प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद नाही. परिणामी याचा परिणाम उत्पन्नावरही होत आहे. उत्पन्न वाढण्यासाठी महामंडळातर्फे प्रवाशांची संख्या जास्त असलेल्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग

इन्फो :

आकडे काय सांगतात?

आगार कर्मचारी