शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST

जळगाव : प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दल विलक्षण ओढ असते. दीड वर्षापासून मात्र कोरोनाने सासुरवाशिनीची वाट अडविली आहे. कोरोनामुळे कोणत्याही ...

जळगाव : प्रत्येक सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दल विलक्षण ओढ असते. दीड वर्षापासून मात्र कोरोनाने सासुरवाशिनीची वाट अडविली आहे. कोरोनामुळे कोणत्याही महिलेला माहेरी येता आले नाही. आषाढ महिन्यात ठिकठिकाणी रथोत्सव असतो, यानिमित्ताने सासुरवाशिणी माहेरी येतात. त्याशिवाय कानुबाई यांचा उत्सवही याच कालखंडात असतो.

खान्देशात अक्षय्य तृतीया अर्थात आखाची हा महत्त्वाचा मानला जातो. अक्षय्य तृतीया व दिवाळी या काळात सासुरवाशिणी महिना, पंधरा दिवसांसाठी माहेरी येते. आषाढीत दोन-चार दिवसांसाठी येते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आदी उत्सव या महिन्यात असतात. आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता काही दिवसांसाठी आपल्या माहेरी येत असली तरी यंदा त्यात खंड पडला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारीसाठी सासरचे लोक नवविवाहितेला माहेरी पाठवत नाहीत. वृध्द तसेच दमा, मधुमेह व इतर आजार असलेल्यांना अधिक धोका असल्यामुळे उगाच जोखीम पत्करायला कुणी तयार नाही. कोरोनामुळेच यंदा आषाढीला माहेरी जाता आले नसल्याचे सीमा विजयसिंग पाटील या विवाहितेने सांगितले.

आषाढीचा रथोत्सव हा लोकोत्सव असल्याने मोठी गर्दी होते. यानिमित्ताने सर्वच सासुरवाशिणी माहेरी येत असल्याने मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात. नवविवाहिताच नाही तर अगदी वयस्कर व वृध्द महिलादेखील यानिमित्ताने माहेरी येतात. पिंप्राळ्यात रथोत्सव मोठा असल्याने शक्यतो येथील विवाहिता माहेरी जात नाही, ज्यांच्या मुलींचे लग्न झाले आहे, त्याच येथे येतात. यंदा मात्र सर्वच ठिकाणी कोरोनाने वाट अडविली आहे.

कोरोना काळात विवाहांची नोंद

२०२० -२२३

२०२१ (१५जुलैपर्यंत) -१२३

नवविवाहिता म्हणतात..

दीड वर्षापासून सासरीच

कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हापासून माहेरी जायला संधीच मिळाली नाही. सासरच्या मंडळींनीदेखील धोका नको म्हणून परवानगी दिली नाही. माहेरची ओढ असली तरी मोबाइलवर बोलणे होते. कधी व्हिडीओकॉल होतो. यंदाही जाणे शक्य नाही. कोरोनाचा संसर्ग नसला तर दिवाळीत भाऊबीजेला जाता येईल, नाही तर तेव्हाही शक्य नाही.

- मोनिका सुनील पाटील

कोरोनामुळेच ब्रेक

कोरोनामुळेच माहेरी जाता येत नाही. मुले लहान असल्याने उगाचच धोका नको. माहेरी गेल्यावर इतर नातेवाईक व मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. गावातच विठ्ठल-रु‌ख्माईचे मंदिर असल्याने यंदा माहेरी जाणार नाही. सुखदु:खाच्यावेळीदेखील कोरोनामुळे आता मर्यादा यायला लागल्या आहेत.

- कोमल विनोद पाटील

नवविवाहित मुलींच्या आई म्हणतात..

रेल्वेगाड्यांची अडचण

कोरोनामुळे मर्यादितच रेल्वेगाड्या सुरू आहेत. त्यामुळे आरक्षण मिळायलाही अडचणी येत आहेत. दोन वर्षांपासून मुलीची भेट नाही. तिला माहेरी येता येत नाही व मलाही तिच्याकडे जाता येत नाही. आषाढीच काय तर इतर सण, उत्सव व सुखदु:खाच्यावेळीदेखील आम्हा मायलेकींना एकमेकीजवळ जाता आले नाही. कोरोनाने अनेक अडचणी निर्माण केलेल्या आहेत.

- उषा संजय चव्हाण

घराला घरपण

मुलगी माहेरी आली की घराला कसे घरपण येते. घर भरलेले व आनंदाचे वातावरण असते. आषाढीला मुलीने यावे यासाठी आम्ही विनंती केली, मात्र कोरोनामुळेच सासरच्यांनी नकार दिला. तिला लहान बाळ असल्याने आम्ही पण जास्त सक्ती केली नाही. फोनवर बोलणे व व्हिडीओकॉल करून प्रत्यक्ष संवाद होत असल्याने त्यात आनंद मानते.

- रेखा राजेंद्र पाटील