शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

आठ महिन्यानंतरही शिव कॉलनी पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये चेंज ऑफ स्कोपमध्ये या कामाचा प्रस्ताव नागपूरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. याला आठ महिने उलटले तरी अद्याप या उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि महामार्गावरील नेहमीच होणारे अपघात पाहता शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली. या रस्त्यावर सर्वात धोकादायक चौक म्हणजे शिव कॉलनी आहे. येथे पोलिसांनीही अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे. तरीही चौपदरीकरणाच्या मुळ आराखड्यात शिवकॉलनीतील उड्डाणपुलाला ‌वगळण्यात आले होते. नंतर खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी करून येथे उड्डाणपुल किंवा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या सल्लागाराकडे नागपूरला पाठवले. मात्र मे २०२१ उजाडला तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कामगार परतायला सुरूवात

लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय कामगार आता पुन्हा परत यायला सुरूवात झाली आहे. जेव्हा जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तेव्हा या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे फक्त १६ कामगार आणि ७ कर्मचारी शिल्लक राहिले होते. मात्र नंतर हळु हळु कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता बरेच जण पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. आता पुन्हा कामाला वेग मिळणार असला तरी पावसाळ्यामुळे पुन्हा किती काम होते, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुजितकुमार सिंग यांनी सांगितले की,‘ लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कर्मचारी आता परत येत आहेत. मात्र आता पावसामुळे पुन्हा एकदा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. जेथे पाणी असेल तेथे काम करता येणार नाही.’