शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आठ महिन्यानंतरही शिव कॉलनी पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये चेंज ऑफ स्कोपमध्ये या कामाचा प्रस्ताव नागपूरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. याला आठ महिने उलटले तरी अद्याप या उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि महामार्गावरील नेहमीच होणारे अपघात पाहता शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली. या रस्त्यावर सर्वात धोकादायक चौक म्हणजे शिव कॉलनी आहे. येथे पोलिसांनीही अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे. तरीही चौपदरीकरणाच्या मुळ आराखड्यात शिवकॉलनीतील उड्डाणपुलाला ‌वगळण्यात आले होते. नंतर खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी करून येथे उड्डाणपुल किंवा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या सल्लागाराकडे नागपूरला पाठवले. मात्र मे २०२१ उजाडला तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कामगार परतायला सुरूवात

लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय कामगार आता पुन्हा परत यायला सुरूवात झाली आहे. जेव्हा जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तेव्हा या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे फक्त १६ कामगार आणि ७ कर्मचारी शिल्लक राहिले होते. मात्र नंतर हळु हळु कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता बरेच जण पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. आता पुन्हा कामाला वेग मिळणार असला तरी पावसाळ्यामुळे पुन्हा किती काम होते, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुजितकुमार सिंग यांनी सांगितले की,‘ लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कर्मचारी आता परत येत आहेत. मात्र आता पावसामुळे पुन्हा एकदा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. जेथे पाणी असेल तेथे काम करता येणार नाही.’