शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यानंतरही शिव कॉलनी पुलाला मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळ आराखड्यात शिव कॉलनीत उड्डाण पुलाचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र नंतर परिसरातील नागरिकांच्या मागणीमुळे ऑक्टोबर २०२० मध्ये चेंज ऑफ स्कोपमध्ये या कामाचा प्रस्ताव नागपूरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. याला आठ महिने उलटले तरी अद्याप या उड्डाण पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या कामाला मंजुरी देण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि महामार्गावरील नेहमीच होणारे अपघात पाहता शहरातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला देखील मंजुरी मिळाली. या रस्त्यावर सर्वात धोकादायक चौक म्हणजे शिव कॉलनी आहे. येथे पोलिसांनीही अपघाताच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉट घोषित केला आहे. तरीही चौपदरीकरणाच्या मुळ आराखड्यात शिवकॉलनीतील उड्डाणपुलाला ‌वगळण्यात आले होते. नंतर खासदार उन्मेश पाटील यांनी पाहणी करून येथे उड्डाणपुल किंवा भुयारी मार्गाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव कार्यालयाने त्याबाबतचे प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाच्या सल्लागाराकडे नागपूरला पाठवले. मात्र मे २०२१ उजाडला तरीही या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

कामगार परतायला सुरूवात

लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले परप्रांतीय कामगार आता पुन्हा परत यायला सुरूवात झाली आहे. जेव्हा जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. तेव्हा या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे फक्त १६ कामगार आणि ७ कर्मचारी शिल्लक राहिले होते. मात्र नंतर हळु हळु कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता बरेच जण पुन्हा कामावर येऊ लागले आहेत. आता पुन्हा कामाला वेग मिळणार असला तरी पावसाळ्यामुळे पुन्हा किती काम होते, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ठेकेदार संस्थेचे प्रकल्प उपसंचालक सुजितकुमार सिंग यांनी सांगितले की,‘ लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कर्मचारी आता परत येत आहेत. मात्र आता पावसामुळे पुन्हा एकदा कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो. जेथे पाणी असेल तेथे काम करता येणार नाही.’