शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बेवारस मृतदेहांचा शेवटही होतोय कचऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:16 IST

सुनील पाटील जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन ...

सुनील पाटील

जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन भूक व तहान भागविली. विविध सरकारी व निमसरकारी रुग्णालयांमध्ये गरिबांना आयुर्वेदिक काढा तसेच इतर वैद्यकीय सेवा पुरविल्या. एकीकडे हे आशादायी चित्र असताना दुसरीकडे मात्र अपघात किंवा वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या बेवारसांचा शेवट हा कचऱ्यातच होत आहे, याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना सामाजिक संघटना. शहरातील कचरा ज्या ठिकाणी फेकला जातो त्याच जागेवर या बेवारसांचा दफनविधी केला जात आहे. मुबारक चांद शेख(३४,रा. लक्ष्मीनगर) हा तरुण वयाच्या दहाव्या वर्षापासून बेवारस मृतदेहांचा दफनविधी करीत आहे.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात सध्या नेरी नाका, मेहरुण व पिंप्राळा या भागात स्मशानभूमी उभारण्यात आलेल्या आहेत. नेरी नाका स्मशानभूमी महापालिकेच्या नियंत्रणात आहेत. सध्या कोरोनामुळे या स्मशानभूमी मृतदेह अक्षरशः वेटिंगवर आहेत. इतर मृतदेहांना तर येथे एन्ट्रीच नाही. नातेवाईकांना यायला उशीर होत असेल किंवा अंत्यसंस्काराला विलंब होणारा असेल हे मृतदेह ठेवण्यासाठी वातानुकूलित शवदाहिनी आहे तर आता कोरोनात अग्निदाहिनीचीही निर्मिती झाली आहे.

विविध संघटना तसेच शासकीय रुग्णालयातील या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ज्यांना वारस आहे, त्या मृतदेहांवर विधीवत तथा परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार होतात, मात्र ज्यांना वारस नाही अशा मृतदेहांसाठी तर स्मशानभूमीच नाही. नेरी नाका स्मशानभूमीच्या बाजूला नाल्याला लागून सडक्या कचऱ्याच्या जागी या मृतदेहांचा दफनविधी केला जात आहे. यासाठी पुढाकार घ्यायला कुणीच तयार नाही हे दुर्दैव आहे. महिन्याला तीन ते चार तर वर्षाला ४८ ते ६० बेवारस मृतदेहांचा दफनविधी या ठिकाणी केला जातो.

पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची वेळ

बेवारस म्हणून पुरलेला मृतदेह नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर बाहेर काढावे लागले आहे. शासकीय नियमानुसार तीन दिवस मृतदेह सांभाळावा लागतो. नातेवाईक किंवा वारस नाही आले तर त्या मृतदेहाचा दफनविधी केला जातो. हा मृतदेह जाळला जात नाही. नातेवाईक मिळाल्यानंतर काही मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत तर काही मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेऊन विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहे. काही प्रकरणांमध्ये डीएनए नमुने घेण्यासाठी मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत अशी माहिती मुबारक शेख यांनी दिली.

बेवारस मृतदेह हीच रोजीरोटी (फोटो मुबारक)

बेवारस मृतदेहांवर दफनविधी करणारा मुबारक शेख यांचीही दुर्दैवी कहाणी आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच आईवडिलांचे निधन झाले. तेव्हापासून दफन विधीचे कार्य हाती घेतले. मिळालेल्या दोन पैशातून प्रपंच चालवला जातो. पत्नीच्या आईवडिलांचे निधन झालेले आहे. दोन मुले व पत्नी असे लक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात राहतो, जे काम कोणी करू शकत नाही ते करीत असतानाही आज आपण स्वतःच बेवारस आहोत अशी भावना निर्माण होते. महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाने साधे घरकुल मिळवून दिले नसल्याची खंत मुबारक शेख यांनी व्यक्त केली.