शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
2
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
3
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
6
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
7
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
8
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
9
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
10
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
11
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
12
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
13
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
14
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
15
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
16
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
17
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
18
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
19
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
20
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहांचा शेवटही होतोय कचऱ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:16 IST

सुनील पाटील जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन ...

सुनील पाटील

जळगाव : कोरोना महामारी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी आधार नसलेल्या जीवांना दोन वेळचे जेवण, पाणी देऊन भूक व तहान भागविली. विविध सरकारी व निमसरकारी रुग्णालयांमध्ये गरिबांना आयुर्वेदिक काढा तसेच इतर वैद्यकीय सेवा पुरविल्या. एकीकडे हे आशादायी चित्र असताना दुसरीकडे मात्र अपघात किंवा वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या बेवारसांचा शेवट हा कचऱ्यातच होत आहे, याकडे ना प्रशासन लक्ष देत आहे ना सामाजिक संघटना. शहरातील कचरा ज्या ठिकाणी फेकला जातो त्याच जागेवर या बेवारसांचा दफनविधी केला जात आहे. मुबारक चांद शेख(३४,रा. लक्ष्मीनगर) हा तरुण वयाच्या दहाव्या वर्षापासून बेवारस मृतदेहांचा दफनविधी करीत आहे.

मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात सध्या नेरी नाका, मेहरुण व पिंप्राळा या भागात स्मशानभूमी उभारण्यात आलेल्या आहेत. नेरी नाका स्मशानभूमी महापालिकेच्या नियंत्रणात आहेत. सध्या कोरोनामुळे या स्मशानभूमी मृतदेह अक्षरशः वेटिंगवर आहेत. इतर मृतदेहांना तर येथे एन्ट्रीच नाही. नातेवाईकांना यायला उशीर होत असेल किंवा अंत्यसंस्काराला विलंब होणारा असेल हे मृतदेह ठेवण्यासाठी वातानुकूलित शवदाहिनी आहे तर आता कोरोनात अग्निदाहिनीचीही निर्मिती झाली आहे.

विविध संघटना तसेच शासकीय रुग्णालयातील या सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ज्यांना वारस आहे, त्या मृतदेहांवर विधीवत तथा परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार होतात, मात्र ज्यांना वारस नाही अशा मृतदेहांसाठी तर स्मशानभूमीच नाही. नेरी नाका स्मशानभूमीच्या बाजूला नाल्याला लागून सडक्या कचऱ्याच्या जागी या मृतदेहांचा दफनविधी केला जात आहे. यासाठी पुढाकार घ्यायला कुणीच तयार नाही हे दुर्दैव आहे. महिन्याला तीन ते चार तर वर्षाला ४८ ते ६० बेवारस मृतदेहांचा दफनविधी या ठिकाणी केला जातो.

पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची वेळ

बेवारस म्हणून पुरलेला मृतदेह नातेवाईकांचा शोध लागल्यानंतर बाहेर काढावे लागले आहे. शासकीय नियमानुसार तीन दिवस मृतदेह सांभाळावा लागतो. नातेवाईक किंवा वारस नाही आले तर त्या मृतदेहाचा दफनविधी केला जातो. हा मृतदेह जाळला जात नाही. नातेवाईक मिळाल्यानंतर काही मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत तर काही मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत नेऊन विधिवत अंत्यसंस्कार केलेले आहे. काही प्रकरणांमध्ये डीएनए नमुने घेण्यासाठी मृतदेह बाहेर काढावे लागले आहेत अशी माहिती मुबारक शेख यांनी दिली.

बेवारस मृतदेह हीच रोजीरोटी (फोटो मुबारक)

बेवारस मृतदेहांवर दफनविधी करणारा मुबारक शेख यांचीही दुर्दैवी कहाणी आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच आईवडिलांचे निधन झाले. तेव्हापासून दफन विधीचे कार्य हाती घेतले. मिळालेल्या दोन पैशातून प्रपंच चालवला जातो. पत्नीच्या आईवडिलांचे निधन झालेले आहे. दोन मुले व पत्नी असे लक्ष्मीनगरात भाड्याच्या घरात राहतो, जे काम कोणी करू शकत नाही ते करीत असतानाही आज आपण स्वतःच बेवारस आहोत अशी भावना निर्माण होते. महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासनाने साधे घरकुल मिळवून दिले नसल्याची खंत मुबारक शेख यांनी व्यक्त केली.