शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला कर्मचाऱ्यांचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

एस.टी. महामंडळ : तीन महिन्या ऐवजी आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी कर्मचारी अनुत्सुक : आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी ...

एस.टी. महामंडळ : तीन महिन्या ऐवजी आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी

कर्मचारी अनुत्सुक : आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी

जळगाव : राज्य परिवहन महामंडळाने वयाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबत योजना आणली आहे. मात्र, या निवृत्तीमध्ये कर्मचाऱ्यांचेच आर्थिक नुकसान होणार असल्याने स्वेच्छा सेवानिवृत्तीला जळगाव विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी अनुत्सुकता दर्शविली आहे. तर कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता, स्वेच्छानिवृत्तीसाठी तीनऐवजी आठ महिन्यांचे वेतन देण्याची मागणी इंटक संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

महामंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजना राबविण्याबाबत नुकतेच प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये प्रत्येक आगारातील वयाची ५० वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ही योजना समजावून सांगितली जाणार आहे. ही जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर सोपविली जाणार आहे. या योजनेनुसार सध्या ५० वय ओलांडलेल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेताना मूळ वेतन व महागाई भत्त्यासह प्रत्येक वर्षासाठी बाराऐवजी तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. नियम स्वेच्छानिवृत्तीचे लाभही देण्यात येणार आहे. मोफत कौटुंबिक पासची योजनाही लागू राहणार आहे. या सर्व अटी-शर्ती ज्या कर्मचाऱ्यांना मंजूर असतील, त्या कर्मचाऱ्यांकडून स्वेच्छानिवृत्तीचे संमतीपत्र भरून घेतले जाणार आणि त्यानंतर स्वेच्छानिवृत्तीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मात्र, या योजनेविषयी कर्मचाऱ्यांनमध्ये जोरदार चर्चा सुरू कर्मचाऱ्यांमधून वेगवेगळे मतप्रवाह उमटून जळगाव विभागातील बहुतांश कर्मचाऱ्यांमधून विरोध दर्शविण्यात येत आहे.

इन्फो :

..तर आर्थिक नुकसानच होणार

महामंडळाच्या या योजनेबाबत वय वर्ष ५० पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आता सेवाज्येष्ठतेनुसार सरासरी ५० हजार रुपये पगार घेत आहोत. वर्षाला ६ लाख इतके उत्पन्न होते. मात्र, आता जर महामंडळाच्या स्वेच्छासेवानिवृत्तीनुसार आम्ही निवृत्ती घेतली तर प्रत्येक वर्षासाठी तीन महिन्यांचेच वेतन मिळेल, त्यामुळे या योजनेमुळे आमचे आर्थिक नुकसान होणार असल्याच्या भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

इन्फो :

महामंडळाच्या या निवृत्ती योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना वर्षांसाठी बाराऐवजी तीनच महिन्यांचे वेतन मिळणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तीन महिन्यांऐवजी आठ महिन्यांचे वेतन द्यावे, ही आमची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना