शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

दोन आठवड्यांनी समोर येऊ शकतात गर्दीचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत मास्कचा व्यवस्थित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत मास्कचा व्यवस्थित वापर न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या गर्दीचे परिणाम हे दहा ते चौदा दिवसांनंतर समोर येतील व तेव्हा नेमके चित्र स्पष्ट होईल, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी नियम न पाळल्यास धोका कायम राहणार असल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.

पहिल्या लाटेनंतरच्या शिथिलतेमुळे कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक झाल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे. यात बाजारपेठांमधील गर्दी ही अनियंत्रित होती. शिवाय लग्न सोहळ्यांमध्ये उडालेली गर्दी व ग्रामपंचायतीच्या निवडणुका ही काही कारणे रुग्णसंख्या वाढीस समोर आली होती. शिवाय त्यातच विषाणूची तीव्रता वाढल्यानेही धोका वाढल्याचे सांगण्यात येत होते. आता रुग्णसंख्या घटण्यामागे विषाणूची तीव्रता कमी होणे हेही एक कारण असू शकते असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. गर्दीचे परिणाम आताच तातडीने समोर येणार नाहीत. यासाठी कालावधी लागेल मात्र, साधारण दोन आठवड्यानंतर या गर्दीचा नेमका काय परिणाम होतोय हे समोर येईल, सध्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. मात्र, गर्दीत सोशल डिस्टन्सिंग राहात नसल्याने संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी भीती आहे.

संसर्गाचे दोन प्रकार

शहरात आता दहा ते तीस या दरम्यान बाधित आढळून येत आहे. त्यामुळे शहरात संसर्ग कमी असला तरी बाहेरील व्यक्तिंकडून तो वाढू शकतो, गर्दीत कोण कुठून आला आहे हे सांगणे कठीण असते, त्यामुळे स्थानिक संसर्ग व बाहेरून येणारा संसर्ग असे संसर्गाचे दोन प्रकार होतात, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे गर्दीतून आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी म्हटले आहे.

ही घ्या काळजी

- मास्कने व्यवस्थित नाक, तोंड झाका ते मानेवर किंवा केवळ तोंडावर लावू नका

- शक्यतोवर बाहेर पडणे टाळा, किंवा बाहेरून आल्यावर हात - पाय, चेहरा स्वच्छ धुवा

- गर्दीची ठिकाणे टाळावी, कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात धुतल्यानंतर नाका तोंडाला लावा.

कोट

गर्दीतून रुग्णसंख्या वाढण्याचा धोका अधिक आहे. साधारण दोन आठवड्यांनी याचे परिणाम समोर येतील. नागरिकांनी स्वत: काळजी घेणे यासाठी महत्त्वाचे आहे. मास्क हा नाका, तोंडावर व्यवस्थित वापरावा तो मानेवर लटकवू नये, घरी आल्यानंतर हात पायच नाही तर चेहराही स्वच्छ धुवावा, शक्यतोवर बाहेर फिरणे टाळावे. - डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यक शास्त्र विभाग