शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली -डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. लोकमत ...

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली

-डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील,

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्र्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतुवर होताना दिसून येत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली असली, तरी मात्र थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र, या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात ७ अंशाची घट झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायबच झाली आहे. साधारणपणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होत असते. त्यातच यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीला लवकर सुरुवात झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते; मात्र ८ नोव्हेंबरपासून थंडी गायबच झाली आहे. बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना ब्रेक लावला आहे. यामुळे यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम जिल्ह्यावरदेखील झाला आहे. किमान तापमानाची सरासरी वाढत असल्याने जिल्ह्यातील रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा, गहू, मक्याच्या वाढीसह उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.