शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली -डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. लोकमत ...

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली

-डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील,

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्र्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतुवर होताना दिसून येत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली असली, तरी मात्र थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र, या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात ७ अंशाची घट झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायबच झाली आहे. साधारणपणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होत असते. त्यातच यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीला लवकर सुरुवात झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते; मात्र ८ नोव्हेंबरपासून थंडी गायबच झाली आहे. बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना ब्रेक लावला आहे. यामुळे यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम जिल्ह्यावरदेखील झाला आहे. किमान तापमानाची सरासरी वाढत असल्याने जिल्ह्यातील रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा, गहू, मक्याच्या वाढीसह उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.