शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:32 IST

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली -डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. लोकमत ...

-नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे निर्माण झाली

-डिसेंबर महिन्यात आता अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील,

जळगाव - गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्र्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतुवर होताना दिसून येत आहे. दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली असली, तरी मात्र थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र, या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात किमान तापमानात ७ अंशाची घट झाली आहे.

नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायबच झाली आहे. साधारणपणे जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीला सुरुवात होत असते. त्यातच यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीला लवकर सुरुवात झाल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाले होते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते; मात्र ८ नोव्हेंबरपासून थंडी गायबच झाली आहे. बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांना ब्रेक लावला आहे. यामुळे यंदा थंडीचे प्रमाण कमी झाले आहे.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

जळगाव जिल्ह्याचा विचार केल्यास हिवाळ्यातील नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम जिल्ह्यावरदेखील झाला आहे. किमान तापमानाची सरासरी वाढत असल्याने जिल्ह्यातील रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरभरा, गहू, मक्याच्या वाढीसह उत्पादनावरही त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.