शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘अवकाळी’ मुळे कोथिंबीर भाव खातेय, किराणा साहित्याचेही दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:39 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. भाजीपाल्यात कोथिंबीर, हिरवी ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. भाजीपाल्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कांदे यांचे भाव वाढले आहे. तर टमाटे, भरीताचे वांगे चांगलेच स्वस्त झाले आहे. किराणा साहित्यात शेंगदाणे, तूप, मठ डाळ यांचे भाव वधारले आहे तर साखर स्वस्त झाली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढू लागले होते. ते अद्यापही कायम आहे.

किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. रवा ३५ ते ४० रुपये, मैदा ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या तुपाचेही भाव या आठवड्यात वाढून ते ११० रुपयांवरून १२० ते १२५ रुपयांवर पोहचले आहे.

बटाटे स्वस्त, कांदे वधारले

गेल्या अनेक दिवसांपासून बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ३० रुपयांवर आले होते. आता ते २५ रुपयांवर आले आहे. मात्र कांद्याचे भाव ३० रुपयांवरून ५० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

गाजरचे भाव पुन्हा वधारले

गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३० ते ३५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.

साखरेचा गोडवा

गेल्या काही दिवसांपासून साखर ३८ रुपये प्रति किलोवर स्थिर होते. मात्र आता हे भाव ३६ रुपये प्रति किलोवर आले आहेत. तसे पाहता दिवाळीच्या काळात साखरेला मागणी वाढते व भावही वधारतात. मात्र यंदा हे भाव ३८ रुपयांवर कायम होते. आता ते कमी झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढत आहे. कांदा स्वस्त झाल्याने दिलासा होता. मात्र आता तो पुन्हा वधारल्याने व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने बोझा वाढत आहे.

- संजय कोळी, ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. या आठवड्यात मात्र साखर व साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत.

- सचिन छाजेड, व्यापारी

अवकाळी पावसामुळे कोथिंबीरच्या आवकवर परिणाम झाल्याने त्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. सोबतच कांद्याचेही भाव वधारले आहेत. टमाटे मात्र स्वस्त झाले आहे.

- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते