शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उन्हामुळे रक्ताचा झराही आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 11:56 IST

‘रक्तपेढी आपल्या दारी’तून रक्तसंकलनासाठी धडपड

जळगाव : वाढत्या उन्हामुळे भीषण टंचाईचे दुर्भीक्ष उद््भविलेले असताना रक्ताचाही तुटवडा तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांना मागणीच्या तुलनेत रक्त उपलब्ध करून देताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या मागणी दुप्पट झाली आहे तर रक्तदात्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरात ‘रक्तपेढी आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून रक्तसंकलनासाठी धडपड केली जात आहे.मागणी दुप्पट, साठा निम्म्यावरएरव्ही दरवर्षी उन्हाळ््यामुळे रक्त साठ्यात घट होणे हा दरवर्षाचा अनुभव आहे. मात्र या वर्षी उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने रक्तदान शिबिर जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे या वर्षी रक्ताचा तुटवटा अधिक जाणवत आहे. यामध्ये एरव्ही दररोज ९० ते १०० बाटल्या रक्ताची मागणी असताना त्या तुलनेत रक्तसाठा उपलब्ध होतो. मात्र सध्या ही मागणी दुप्पट झाली असताना साठा मात्र निम्म्यावर आला आहे. त्यामुळे हा ताळमेळ जुळत नसल्याने रक्तपेढी चालकांकडून जनजागृती केली जात आहे.रक्त येईल कोठूनरक्ताचा मुख्य स्त्रोत तरुण वर्ग आहे, मात्र सध्या महाविद्यालयांना सुट्या असल्याने त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे रक्तपेढीच्यावतीने सांगण्यात आले. या सोबतच लग्न सराईमुळे अनेक जण बाहेर गावी असल्याने रक्तदान शिबिरही होत नाही. सर्वात मोठा परिणाम या वर्षी झाला तो निवडणुकीमुळे. कार्यकर्ते निवडणुकीत अडकल्याने रक्तदानाकडे जवळपास पाठ फिरविल्याचेच यंदा रक्तसाठ्यात अधिक घट झाल्याचेही सांगण्यात आले.‘बी पॉझिटीव्ह’ मिळेनाउन्हाळ््यामध्ये नियोजन करून शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या काळात अधिक रक्ताची गरज भासते. या शस्त्रक्रियांमध्ये ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठीच एका जणास जवळपास १२ ते १३ रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नाही. यासोबतच इतरही शस्त्रक्रियांची संख्या अधिक असते. यंदाच्या रक्त साठ्याची उपलब्धता पाहता नेहमीपेक्षा ही संख्या निम्म्यापेक्षाही घटली आहे. नेहमी एकेका रक्तपेढीत १००च्या पुढे असणाऱ्या एक-एक रक्त गटाच्या पिशव्या सध्या एक-एक पिशवीवर तर मोजक्याच रक्तगटाच्या पिशव्या ३० ते ६० दरम्यान उपलब्ध आहेत. यात ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा अधिक तुटवडा असल्याचे रक्तपेढीच्यावतीने सांगण्यात आले. २५ मे रोजीचा साठा पाहिला तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत ‘एबी निगेटीव्ह’, ‘ओ निगेटीव्ह’ यांची केवळ प्रत्येकी एक-एक पिशवी तर ‘ए निगेटीव्ह’च्याही दोनच पिशव्याउपलब्धहोत्या.यावरूनरक्ततुटवड्याचाअंदाजयेऊशकतो.रक्तपेढी आपल्या दारीरक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने रक्तपेढ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीच्यावतीने ‘रक्तपेढी आपल्या दारी’ ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये ज्यांना रक्तदानाची इच्छा असली तरी वेळेअभावी ते रक्तपेढीत जावू शकत नाही व एका ठिकाणी १० जण रक्तदाते असल्यास तेथे ‘मोबाईल डोनर व्हॅन’पाठवून रक्तसंकलन केले जाते. तसेच इतरही कोणी इच्छुक असल्यास त्यांना रक्तपेढीत आणून व रक्तदानानंतर पुन्हा त्यांना सोडण्यात येत आहे. या संकल्पनेमुळे दररोज किमान ८ ते १० बाटल्यांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.सध्या वाढत्या उन्हामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गरजूंना रक्त उपलब्ध करून देताना मोठी कसरत होत आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. नियमित रक्तदान केल्याने पक्षघात (पॅरालेसेस) तसेच ह्रदयविकाराचे प्रमाण ७० टक्क्याने कमी होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तपेढी चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी.सध्या रक्ताची उपलब्धता कमी झाली आहे तर मागणी दुप्पट झाली आहे. त्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. रक्तदानासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.- भानुदास येवलेकर, आरोग्य विभाग प्रमुख, गोळवलकर रक्तपेढी.

टॅग्स :Jalgaonजळगाव