शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली, ५० टक्के प्रवासीही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

सचिन देव जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर ...

सचिन देव

जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. त्यात दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे, औरंगाबाद, नाशिक, धुळे या मार्गावर जादा बसेस सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही महामंडळाची बससेवा मार्च ते मेपर्यंत बंद होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, महामंडळातर्फेही टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. मागील महिन्यापासून परराज्यातही बससेवा सुरू केली आहे, तर आता १५ ऑगस्टपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक मार्गावर दर तासाला फेऱ्या सुरू केल्या आहेत, तसेच आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, धुळे, चाळीसगाव, मालेगाव. यासह सूरत, अंकलेश्वर या मार्गावरही जादा बसेस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षणाचींही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे घरी बसूनही बसचे तिकीट बुकिंग करता येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- हावडा एक्स्प्रेस

- काशी एक्स्प्रेस

- कामायनी एक्स्प्रेस

- सेवाग्राम एक्स्प्रेस

इन्फो :

या मार्गावर वाढविल्या फेऱ्या

जळगाव ते औरंगाबाद

जळगाव ते नाशिक

जळगाव ते धुळे

जळगाव ते पुणे

इन्फो

प्रवाशांची गर्दी वाढली

- सध्या रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळेही अनेक प्रवासी बसेसचा आधार घेत आहेत. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, धुळ्यासह पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव या मार्गांवरही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

- तसेच शनिवारी सुट्टी व रविवारी रक्षाबंधन असल्यामुळे नोकरदार वर्ग एक दिवस आधीच आपल्या मूळगावी किंवा बहिणींकडे रवाना होत आहेत, तसेच खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येत असल्यामुळे, बसेसला गर्दी वाढली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने १५ ऑगस्टपासून अनलॉक केल्यानंतर, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे बसेसला गर्दी होत असून, त्यात रक्षाबंधनामुळे ५० टक्क्यांपर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव आगारातर्फे अनेक मार्गावर जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

- नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार.