शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली, ५० टक्के प्रवासीही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST

सचिन देव जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर ...

सचिन देव

जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. त्यात दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे, औरंगाबाद, नाशिक, धुळे या मार्गावर जादा बसेस सुरू केल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही महामंडळाची बससेवा मार्च ते मेपर्यंत बंद होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, महामंडळातर्फेही टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. मागील महिन्यापासून परराज्यातही बससेवा सुरू केली आहे, तर आता १५ ऑगस्टपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक मार्गावर दर तासाला फेऱ्या सुरू केल्या आहेत, तसेच आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, धुळे, चाळीसगाव, मालेगाव. यासह सूरत, अंकलेश्वर या मार्गावरही जादा बसेस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षणाचींही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे घरी बसूनही बसचे तिकीट बुकिंग करता येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- हावडा एक्स्प्रेस

- काशी एक्स्प्रेस

- कामायनी एक्स्प्रेस

- सेवाग्राम एक्स्प्रेस

इन्फो :

या मार्गावर वाढविल्या फेऱ्या

जळगाव ते औरंगाबाद

जळगाव ते नाशिक

जळगाव ते धुळे

जळगाव ते पुणे

इन्फो

प्रवाशांची गर्दी वाढली

- सध्या रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळेही अनेक प्रवासी बसेसचा आधार घेत आहेत. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, धुळ्यासह पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव या मार्गांवरही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

- तसेच शनिवारी सुट्टी व रविवारी रक्षाबंधन असल्यामुळे नोकरदार वर्ग एक दिवस आधीच आपल्या मूळगावी किंवा बहिणींकडे रवाना होत आहेत, तसेच खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येत असल्यामुळे, बसेसला गर्दी वाढली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने १५ ऑगस्टपासून अनलॉक केल्यानंतर, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे बसेसला गर्दी होत असून, त्यात रक्षाबंधनामुळे ५० टक्क्यांपर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव आगारातर्फे अनेक मार्गावर जादा बसेस सोडण्यात येत आहेत.

- नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार.