शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

नैसर्गिक प्रवाह अडवल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST

अमळनेर : बंद केलेल्या नाल्यांमुळे शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने शहरातील कॉलन्यांमध्ये पाणी शिरले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी ...

अमळनेर : बंद केलेल्या नाल्यांमुळे शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने शहरातील कॉलन्यांमध्ये पाणी शिरले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक वर्षांपासून गटारी नसल्याने या समस्या उद्भवल्या आहेत.

शहराच्या दक्षिणेस अनेक कॉलनी भागात नाला अरूंद केल्याने जादाचा पाऊस झाल्याने ते पाणी नाला ओलांडून कॉलनी परिसरात घुसले.

काही दिवसांपूर्वी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पिंपऱ्या नाल्यावर काही प्लॉट व्यवसायिकांनी ९ मीटरचा नाला अरूंद केल्याची तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही म्हणून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रसाद नगर भागात पाण्यातून मोटारसायकलदेखील जाऊ शकत नव्हती. अनेक घरच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी साचले होते. तीच बाब पिंपळे रोडवर घडली आहे.

प्लॉटधारक, दुकानदारांनी नाले बुजल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केली आहे. त्यांच्याविरुद्ध मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६प्रमाणे कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांकडे केली आहे तसेच बांधकामास परवानगी देणाऱ्या अभियंत्यांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.

शहराच्या पश्चिमेकडून येणाऱ्या शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अरुंद केल्याने एलआयसी कॉलनी, क्रांतीनगर, टेलिफोन कॉलनी, विठ्ठल नगर आदी भागात दुसऱ्या दिवशी देखील गुडघाभर पाणी साचले होते.

या भागात अनेक वर्षांपासून गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पालिका आणि महसूल प्रशासनाने योग्य नियोजन करून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अन्यथा वारंवार पाणी साचल्याने घरे कमकुवत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

090921\09jal_7_09092021_12.jpg

पालिका व महसूल प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी