शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पावसाअभावी खरिपाची पिके जळू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

नांदेड ता.धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड व अमळनेर तालुक्यातील सावखेडा परीसरात पावसाअभावी खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली ...

नांदेड ता.धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड व अमळनेर तालुक्यातील सावखेडा परीसरात पावसाअभावी खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली असून, आता कोवळी पिके उन्हामुळे जळू लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

शासनाने आता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविम्याचा लाभ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे . तोकड्या पावसावरच शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून, दुबार तिबार पेरण्या केल्यात, परंतु पिकांच्या वाढीसाठी दमदार स्वरूपाचा पाऊसच न झाल्यामुळे आजपावेतो अधून मधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यावरच पिके कशीबशी तग धरून होती, परंतु आता पावसाचे शिंतोडेही बंद झाल्याने दुपारच्या वेळी असणाऱ्या उन्हामुळे कोवळी पिके आता जळू लागली आहेत. जमिनीची तहान पूर्ण भागलेली नसून खालचा भाग पूर्णतः कोरडाठाक आहे. आता तर जमिनीच्या वरच्या भागावरही कोवळ्या पिकांजवळ बारीक बारीक तडे पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी, कपाशी, उडीद, मूग, तीळ, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची वाढ खुंटलेली असून, हंगाम पूर्णतः हातचा जाण्याच्या मार्गावर आहे.

नांदेड, साळवा, सावखेडा, धावडे, मुंगसे, पातोंडा, रुंधाटी, मठगव्हाणपासून सर्वदूर हीच स्थिती आहे. बहुसंख्य शेतकरी निदान पुढे रब्बीचा हंगाम तरी चांगला येईल, या आशेने खरिपाच्या पिकांवर ओखर फिरवत असल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी मजूरवर्गाच्या हातालाही काम नसल्याने त्यांची स्थिती ही दयनीय झाली आहे .एकूणच पावसाअभावी दे माय धरणी ठाय अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात पेयजलाचाही प्रश्न मोठा बिकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसह पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

[ फोटोः पावसाअभावी कपाशीच्या पिकाची वाढ अशी खुंटली असून, पीक जमीन सोडायला तयार नाही. छाया- राजेंद्र रडे, नांदेड ] ११/१