शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरिपाची पिके जळू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:20 IST

नांदेड ता.धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड व अमळनेर तालुक्यातील सावखेडा परीसरात पावसाअभावी खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली ...

नांदेड ता.धरणगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड व अमळनेर तालुक्यातील सावखेडा परीसरात पावसाअभावी खरिपाच्या पिकांची स्थिती अतिशय दयनीय स्वरूपाची झालेली असून, आता कोवळी पिके उन्हामुळे जळू लागल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

शासनाने आता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पीकविम्याचा लाभ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे . तोकड्या पावसावरच शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून, दुबार तिबार पेरण्या केल्यात, परंतु पिकांच्या वाढीसाठी दमदार स्वरूपाचा पाऊसच न झाल्यामुळे आजपावेतो अधून मधून येणाऱ्या पावसाच्या शिडकाव्यावरच पिके कशीबशी तग धरून होती, परंतु आता पावसाचे शिंतोडेही बंद झाल्याने दुपारच्या वेळी असणाऱ्या उन्हामुळे कोवळी पिके आता जळू लागली आहेत. जमिनीची तहान पूर्ण भागलेली नसून खालचा भाग पूर्णतः कोरडाठाक आहे. आता तर जमिनीच्या वरच्या भागावरही कोवळ्या पिकांजवळ बारीक बारीक तडे पडायला सुरुवात झाली आहे. परिणामी, कपाशी, उडीद, मूग, तीळ, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची वाढ खुंटलेली असून, हंगाम पूर्णतः हातचा जाण्याच्या मार्गावर आहे.

नांदेड, साळवा, सावखेडा, धावडे, मुंगसे, पातोंडा, रुंधाटी, मठगव्हाणपासून सर्वदूर हीच स्थिती आहे. बहुसंख्य शेतकरी निदान पुढे रब्बीचा हंगाम तरी चांगला येईल, या आशेने खरिपाच्या पिकांवर ओखर फिरवत असल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी मजूरवर्गाच्या हातालाही काम नसल्याने त्यांची स्थिती ही दयनीय झाली आहे .एकूणच पावसाअभावी दे माय धरणी ठाय अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. पावसाची अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात पेयजलाचाही प्रश्न मोठा बिकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईसह पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

[ फोटोः पावसाअभावी कपाशीच्या पिकाची वाढ अशी खुंटली असून, पीक जमीन सोडायला तयार नाही. छाया- राजेंद्र रडे, नांदेड ] ११/१