शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यात आगामी तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक पूर्णपणे बेहाल झाले आहेत. जळगाव शहराचा पारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक पूर्णपणे बेहाल झाले आहेत. जळगाव शहराचा पारा गेल्या पाच दिवसांपासून ४२ अंशांवर कायम आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, जिल्ह्यात आगामी तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात काहीअंशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस काहीअंशी ढगाळ वातावरणदेखील पहायला मिळू शकते.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक हंगामावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून, हिवाळ्यात मात्र घट झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस गेल्यानंतर, नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची नोंद झाली असून, यामुळे शेतीवरदेखील मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच आता पुन्हा एप्रिल महिन्यातदेखील आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाडा या भागात पावसाची शक्यता सर्वाधिक असून, जिल्ह्यात पावसाचा २० टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाचे नेमके कारण काय ?

गेल्या दोन दिवसांत पूर्वउत्तर प्रदेश व बिहारमधील काही भागांमध्ये एक कमी दाबाचा व चक्रवाती हवांचे क्षेत्र विकसित होऊन विदर्भ ते मध्य महाराष्ट्रपर्यंत पसरलेले आहे. याच्याव्यतिरिक्त बंगालच्या उपसागराकडून मात्र युक्त हवा महाराष्ट्राकडे वाहून येत आहे, यामुळे राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह काहीअंशी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

केळीला बसू शकतो फटका

हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने , केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील रबी पिके जवळजवळ पूर्णपणे काढण्यात आली आहेत. यामुळे केळीच्या बागेला वादळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस झाला तर कडबा ओला होऊन पुढे चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.