शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आगामी तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक पूर्णपणे बेहाल झाले आहेत. जळगाव शहराचा पारा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक पूर्णपणे बेहाल झाले आहेत. जळगाव शहराचा पारा गेल्या पाच दिवसांपासून ४२ अंशांवर कायम आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना, जिल्ह्यात आगामी तीन दिवस पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे तापमानात काहीअंशी घट होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील तीन दिवस काहीअंशी ढगाळ वातावरणदेखील पहायला मिळू शकते.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक हंगामावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून, हिवाळ्यात मात्र घट झाली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस गेल्यानंतर, नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची नोंद झाली असून, यामुळे शेतीवरदेखील मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच आता पुन्हा एप्रिल महिन्यातदेखील आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाडा या भागात पावसाची शक्यता सर्वाधिक असून, जिल्ह्यात पावसाचा २० टक्के अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाचे नेमके कारण काय ?

गेल्या दोन दिवसांत पूर्वउत्तर प्रदेश व बिहारमधील काही भागांमध्ये एक कमी दाबाचा व चक्रवाती हवांचे क्षेत्र विकसित होऊन विदर्भ ते मध्य महाराष्ट्रपर्यंत पसरलेले आहे. याच्याव्यतिरिक्त बंगालच्या उपसागराकडून मात्र युक्त हवा महाराष्ट्राकडे वाहून येत आहे, यामुळे राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटांसह काहीअंशी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

केळीला बसू शकतो फटका

हवामान खात्याने जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने , केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील रबी पिके जवळजवळ पूर्णपणे काढण्यात आली आहेत. यामुळे केळीच्या बागेला वादळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पाऊस झाला तर कडबा ओला होऊन पुढे चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.