शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विकासकामे जोरात; पण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST

राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. ...

राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. भाजपचे बारा आमदार विधानसभेत निलंबित झाल्याने येथे या पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. सेनेच्या विरोधात या पक्षाची आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येते असते. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. पालिकेची निवडणूक असल्याने नागरी प्रश्नांवर भाजप आक्रमक भूमिका घेऊन आहे. मग तो पाणी प्रश्न असो वा स्वच्छतेचा. पालिका पदाधिकाऱ्यांवर सतत टीका करून नागरिकांची कामे करण्याचा या पक्षाचा प्रयत्न असतो. विशेषत: शहरातील पाणी प्रश्न या पक्षाकडून लावून धरण्यात येत असतो. कारण गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही पक्षाकडून हा प्रश्न सोडविण्यात अद्याप यश आलेले नाही. प्रश्नाचे भांडवल मात्र अनेक पक्षांनी केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले आरोप-प्रतिआरोप हे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे.

साफसफाईवर भर द्यावा

कोरोनाने गेल्या काळात या शहराला हैराण केले होते. अनेक कुटुंबे यामुळे संकटात आली. काहींचे बळी गेले. सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर थांबला आहे. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा, असे नेहमी पावसाळ्यात म्हटले जाते. आता पावसाळा जोमाने सुरू झाला आहे. या काळात साथ रोगांची भीती व्यक्त केली जात असते. हे लक्षात घेऊन पालिकेने शहरातील साफसफाईच्या कामांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य विभागावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जावे, अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात असते.

----

वार्तापत्र