शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या नावावरील पतसंस्थेत ठेवी अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्थेत दुप्पट ठेवी योजनेत दीड लाखांपर्यंतची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्थेत दुप्पट ठेवी योजनेत दीड लाखांपर्यंतची रक्कम अद्यापही परत मिळाली नसून न्याय मिळावा, अशी मागणी तळवेल व वरणगाव येथील दोन ठेवीदारांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेेऊन हे प्रकरण मांडले.

तळवेल ता. भुसावळ यादव जगन्नाथ पाटील आणि वरणगाव येथील प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी या ठेवी ठेवलेल्या होत्या. यात यादव पाटील यांनी दुप्पट ठेवी योजने अंतर्गत या पतसंस्थेत १० ऑक्टोबर २००६ मध्ये ५० हजार, १७ मे २००६ रोजी २७ हजार, तर १७ ऑगस्ट २००६ रोजी १५०० ठेवले होते. यासह त्यांनी

धनवर्धीनी, महात्मा फुले अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी तसेच लोककल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतही ठेवी आहेत. मात्र, या सर्व पतसंस्थांमध्ये गेल्यानंतर कुठलीही रक्कम मिळाली नाही. असे त्यांनी सांगितले तर प्रकाश चौधरी यांनी एकनाथ खडसे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ६ ऑक्टोबर २००३ मध्ये दहा हजारांच्या ठेवी ठेवल्या मात्र त्या मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान, आम्ही २०१० साली खडसे यांची भेट घेतली होती. मात्र, या पतसंस्थेची माझा कुठलाही संबध नसल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होेते. मात्र, पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. असे दोघा ठेवीदारांनी सांगितले. दरम्यान, ज्याप्रमाणे बीएचआर ठेवीदारांसाठी एकनाथ खडसे यांनी पाठपुरावा केला त्याच प्रमाणे त्यांच्या विभागातील ठेवीदारांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दीपकगुप्ता यांनी यावेळी केली. अशा प्रकरणांमध्ये केवळ गुन्हे दाखल न करता ठेवीदारांना पैसे परत मिळवून देऊन न्याय मिळावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली.

चेअरमन महावितरणमध्ये कार्यरत

या पतसंस्थेचे एक चेअरमन सुधीर कोल्हे यांचे निधन झाले असून आताचे चेअरमन प्रवीण पाटील हे महावितरणमध्ये कार्यरत आहे. ठेवीची विचारणा केल्यानंतर एक लाखाचे तीस हजार घ्या व पावत्या ताब्यात द्या, अशी मागणी चेअरमन कोल्हे यांनी केल्याचा आरोप यादव पाटील केला. दरम्यान, आम्ही दोघे रिक्षाचालक असून ठेवी मिळत नसल्याने आम्ही अडचणीत असून संबधितांकडून पैसे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

केवळ नाव बघून विश्वास

अनेक लोक केवळ नाव पाहून पतसंस्थेवर विश्वास ठेवल्याचेही या ठेवीदारांनी सांगितले. आमचा कष्टाचा पैसा होता. मात्र, अनेक ठेवीदार हे पोलिसात गेले, न्यायालयात गेले त्यांना न्याय न मिळाल्यानेने आपण कोणाकडेच दाद मागितली नाही, असेही दोघांनी सांगितले.

कोट

कोणाचे नाव कोणत्या संस्थेला आहे म्हणून त्याने भ्रष्ट्राचार केला असा त्याचा अर्थ होत नाही. १७ वर्षात जर हे ठेवीदार माझ्याकडे आले असते तर नक्कीच मदत केली असती, आताही मदत करेल. - एकनाथ खडसे, माजी मंत्री