शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

सायगावसह परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी ...

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी पूर्णत: खचला असून, शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी पूर्ण त्रस्त झाला होता व काहीअंशी कोरोनाचे वातावरण हळूहळू निवळताना दिसत होते. त्यामुळे शेतकरी जोमाने आपल्या शेती व्यवसायात मग्न झाला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची लागवडदेखील केली होती. पिके ही दमदार होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. पण मंगळवार रात्र शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली आणि मन्याड धरणाने रौद्ररूप धारण केले.

क्षणार्धात संपूर्ण शेतीची वाट लागली. सलग ४ ते ५ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी तेथेच खचला आता येणारे १०० टक्के पीक २५ टक्के येणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तलाठी गणेश गढरी, कृषी सहाय्यक एस. एस. दांडगे, ग्रामसेवक तिरमली कोतवाल, सागर पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी पंचनामे करायलादेखील सुरुवात केली आहे. आता फक्त शेतकऱ्यांची नजर नुकसानभरपाई केव्हा मिळेल याकडे आहे.

या पावसामुळे रवींद्र पाटील, बाळासाहेब पाटील, नलिंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील, रामभाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, सीताराम पाटील, हरिदास पाटील, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील व अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.