शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

सायगावसह परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी ...

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी पूर्णत: खचला असून, शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी पूर्ण त्रस्त झाला होता व काहीअंशी कोरोनाचे वातावरण हळूहळू निवळताना दिसत होते. त्यामुळे शेतकरी जोमाने आपल्या शेती व्यवसायात मग्न झाला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची लागवडदेखील केली होती. पिके ही दमदार होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. पण मंगळवार रात्र शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली आणि मन्याड धरणाने रौद्ररूप धारण केले.

क्षणार्धात संपूर्ण शेतीची वाट लागली. सलग ४ ते ५ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी तेथेच खचला आता येणारे १०० टक्के पीक २५ टक्के येणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तलाठी गणेश गढरी, कृषी सहाय्यक एस. एस. दांडगे, ग्रामसेवक तिरमली कोतवाल, सागर पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी पंचनामे करायलादेखील सुरुवात केली आहे. आता फक्त शेतकऱ्यांची नजर नुकसानभरपाई केव्हा मिळेल याकडे आहे.

या पावसामुळे रवींद्र पाटील, बाळासाहेब पाटील, नलिंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील, रामभाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, सीताराम पाटील, हरिदास पाटील, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील व अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.