शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

मृगाच्या पावसाची धरसोड; पेरण्यांची तीनतऱ्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST

भुसावळ : यावर्षी सर्वदूर, सार्वत्रिक असा मान्सूनपूर्व व मान्सून दाखल झाल्यानंतरचा पाऊस संपूर्ण मृग नक्षत्रात झाला नाही. मान्सून दाखल ...

भुसावळ : यावर्षी सर्वदूर, सार्वत्रिक असा मान्सूनपूर्व व मान्सून दाखल झाल्यानंतरचा पाऊस संपूर्ण मृग नक्षत्रात झाला नाही. मान्सून दाखल झाल्याचा हवामान विभाग भलेही अंदाज वर्तवीत असला तरी प्रत्यक्षात काही ठिकाणचा अपवाद सोडता पावसाच्या रूपात धो-धो असा पेरण्याजोगा सलग ६०-७० मिली पाऊस पडलाच नाही. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांची, पीक लागवडीच्या तीनतऱ्हा झाल्या आहेत. ज्या पेरण्या झाल्या त्याही पावसाअभावी वाया जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

आठ जूनला मृग नक्षत्र सुरू झाले व २१ जूनला संपले. मंगळवारी आद्रा नक्षत्र लागेल. मागील दोन वर्षेे सात-आठ जूनलाच मृग नक्षत्रात चांगला पाऊस होत पेरण्या मार्गी लागल्या होत्या. दुबार पेर, पेरण्यांची मोड झाली नाही. यावर्षी मान्सूनपूर्व व मृगाचा पाऊस कुठेतरी एका तालुक्यात एका टोकाला झाला तर दुसऱ्या टोकाचा शिवार कोरडा अशी स्थिती आहे. कृषिविभाग ६०-७० मिलिमीटरच्या वर पाऊस झाल्यावरच पेरण्यांची शिफारस करते. बहुसंख्य कृषिमंडळात तो आजवर झालेला नाही. जेथे झाला तेथे सलग न होता दोन-चार दिवसांची टक्केवारी मिळून तो ६०-७० मिलिमीटरवर गेला. ते पेरण्यांसाठी लाभदायक नसते. यामुळे अनेक ठिकाणी स्थिती चिंताजनकच म्हणावी आहे. पेरण्यांची व कोरडवाहू शेतकऱ्यांची मृग नक्षत्रावर व मृगावरच भिस्त असते. यावर्षी मृगाच्या मृगजळात शेतकरी सापडला आहे.

वेगवेगळ्या पद्धतीने पेरण्या

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाभरीच्या चाड्यावर मूठ धरत ७०-८० टक्के कडधान्य, धान्यवर्गीय, तेलबिया व वायवन कपाशीची पेरा होई त्यास पेरण्या म्हणत. आता लागवड व टोकण ही पद्धत रुढ झालिये. ती सर्रासपणे बकसंच, सरी-वरंबा, तुषारसंच अशी सिंचनावर केली जाते. यावर्षी ज्या काही पेरण्या झाल्या आहेत. त्यावरील पद्धतीने किंवा तशी सोय असलेल्यांनीच धाडस केले आहे. यावर्षीच्या नव्हे, तर मागील वर्षीच्या झालेल्या चांगल्या पावसावर, विहिरींना असलेल्या पाण्यावर सर्वाधिक कपाशी, मका लागवड होत आहे व झाली आहे. जवळजवळ तीस ते साठ टक्के तालुकागणिक सिंचनाच्या सोयीनुसार हे प्रमाण आहे. हा झाला पेरण्यांचा एक गट, दुसऱ्या गटात एकाच तालुक्यात पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे गट-तट पडले आहेत. जिथे पाच-सात इंच जमिनीत ओल झाली व तेथील ज्या शेतकऱ्यांनी धाडस केले व पेरणी केली आणि त्यानंतर पुन्हा त्यावर बियाणे अंकुरण येण्याइतपत पाऊस झाला त्या पेरण्या मार्गी लागल्यात. हे प्रमाण दहा ते तीस टक्के अंदाजे तालुक्यापुरते थोडेफार कमी-अधिक आहे. पेरण्याची तिसरी तऱ्हा व प्रकारात ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन-चार दिवसांत मृगाच्या झालेल्या पावसावर किंवा मृगपेरणीची वाफ साधण्यासाठी पेरणी उरकून घेतली; परंतु त्यावर अद्याप पाऊसच झाला नाही त्या पेरण्या. त्यांचे प्रमाणदेखील तालुकानिहाय असमान आहे. ते अंदाजे पाच-दहा टक्के आहे. यामुळे यावर्षी सर्रासपणे एकाचवेळी, सार्वत्रिकपणे पेरण्या किंवा लागवड झाली असे चित्र कुठेच नाही.