शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्पांचा उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ३७.३५ टक्के म्हणजेच ६.७७ टक्के इतका जास्त होता. दिलासादायक बाब म्हणजे यंदा अद्याप सलग जोरदार पाऊस नसला तरी जळगाव शहर व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणात ६०.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र तोही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच आहे.

हवामान खात्याने यंदा जून महिन्यात पावसाची सरासरी कमीच वर्तविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सलग असा जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरणसाठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात जून महिन्यापर्यंत चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र यंदा पाऊस लांबतच असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणसाठ्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये ४०.२८ टक्के जलसाठा होता तो आता ३५.३७ टक्क्यांवर आला आहे.

मध्यम प्रकल्पात १० टक्क्यांहून अधिक घट

गेल्या वर्षी मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१६ टक्के जलसाठा होता तो आता २७.७७ टक्क्यांवर आला आहे तर लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी असलेला १८.०९ टक्के साठा आता ८.४६ टक्क्यांवर आला आहे.

सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर धरणात १७.६५ टक्के (गेल्या वर्षी१८.४३ टक्के), गिरणा धरणात ३२.१७ टक्के (गेल्या वर्षी ३४.४९ टक्के) तर वाघूर धरणात ६०.२९ टक्के (गेल्या वर्षी ७४.९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर १३ मध्यम प्रकल्पांमध्ये २ टीएमसी, ९६ लघु प्रकल्पात ०.५९ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून आजच्या दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के साठा आहे. तर मागील वर्षी हा साठा १८.५३ टीएमसी इतका होता.

तीन मध्यम प्रकल्पात ठणठणात

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. यात अग्नावती, हिवरा, बोरी या मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. मन्याड धरणातही केवळ ६.४३ टक्के जलसाठा शिल्ल्क आहे. या शिवाय अभोरा मध्यम प्रकल्पात ६६.१४ टक्के, मंगरूळ ४२.३६ टक्के, सुकी ७१.०८ टक्के, मोर ५४.०८ टक्के, तोंडापूर ४२.१५ टक्के, बहुळा २१.१६ टक्के, अंजनी १६.८८ टक्के, भोकरबारी १५.३८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.