शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
4
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
5
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
6
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
7
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
8
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
9
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
10
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
11
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
12
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
13
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
14
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
15
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
16
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
17
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
18
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
19
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
20
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणसाठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:13 IST

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ...

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह १३ मध्यम व ९६ लघु प्रकल्पांचा उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ३७.३५ टक्के म्हणजेच ६.७७ टक्के इतका जास्त होता. दिलासादायक बाब म्हणजे यंदा अद्याप सलग जोरदार पाऊस नसला तरी जळगाव शहर व जामनेर तालुक्याची तहान भागविणाऱ्या वाघूर धरणात ६०.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र तोही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच आहे.

हवामान खात्याने यंदा जून महिन्यात पावसाची सरासरी कमीच वर्तविली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सलग असा जोरदार पाऊस झालेला नाही. मध्येच पाऊस होतो व नंतर उघडीप देत आहे. त्यामुळे बळीराजासह धरणसाठ्यांमध्येही वाढ होण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा जोरदार पाऊस नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून वाघूर व गिरणा धरण १०० टक्के भरल्याने त्यात जून महिन्यापर्यंत चांगला जलसाठा राहण्यास मदत झाली. मात्र यंदा पाऊस लांबतच असल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणसाठ्यांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रकल्पांमध्ये ४०.२८ टक्के जलसाठा होता तो आता ३५.३७ टक्क्यांवर आला आहे.

मध्यम प्रकल्पात १० टक्क्यांहून अधिक घट

गेल्या वर्षी मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१६ टक्के जलसाठा होता तो आता २७.७७ टक्क्यांवर आला आहे तर लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी असलेला १८.०९ टक्के साठा आता ८.४६ टक्क्यांवर आला आहे.

सध्या जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर धरणात १७.६५ टक्के (गेल्या वर्षी१८.४३ टक्के), गिरणा धरणात ३२.१७ टक्के (गेल्या वर्षी ३४.४९ टक्के) तर वाघूर धरणात ६०.२९ टक्के (गेल्या वर्षी ७४.९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. तर १३ मध्यम प्रकल्पांमध्ये २ टीएमसी, ९६ लघु प्रकल्पात ०.५९ टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा ५०.४०६ टीएमसी इतका असून आजच्या दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये १५.४१ टीएमसी म्हणजेच ३०.५८ टक्के साठा आहे. तर मागील वर्षी हा साठा १८.५३ टीएमसी इतका होता.

तीन मध्यम प्रकल्पात ठणठणात

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. यात अग्नावती, हिवरा, बोरी या मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. मन्याड धरणातही केवळ ६.४३ टक्के जलसाठा शिल्ल्क आहे. या शिवाय अभोरा मध्यम प्रकल्पात ६६.१४ टक्के, मंगरूळ ४२.३६ टक्के, सुकी ७१.०८ टक्के, मोर ५४.०८ टक्के, तोंडापूर ४२.१५ टक्के, बहुळा २१.१६ टक्के, अंजनी १६.८८ टक्के, भोकरबारी १५.३८ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे.