शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

By admin | Updated: December 22, 2015 00:42 IST

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला निधी जर मार्चअखेर खर्च झाला नाही, तर पुढील हप्ता मिळणार नसल्याची माहिती आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी दिली़ त्यामुळे आता मजीप्रासमोर योजनेचे काम मार्गी लावण्याचे आव्हान असून योजनेला मार्चर्पयत

योजनेचे काम अपूर्ण

शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला वर्ष उलटले आह़े 18 डिसेंबर 2014 रोजी या योजनेच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होत़े परंतु या एक वर्षाच्या कालावधीपैकी सहा महिने काम बंदच आह़े 60 टक्के काम आतार्पयत झाल्याचा दावा ठेकेदाराने केला असला तरी अजून 40 टक्के कामही पूर्ण झालेले नाही़ शहरातील काही भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत़ परंतु जलवाहिन्या टाकण्यासाठी वापरण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार झालेली आह़े त्यामुळे योजनेचे बंद असलेले काम सुरू करण्यापूर्वी आतार्पयत झालेल्या कामातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत़

तर दुसरीकडे कालावधी कमी असल्याने काम दुप्पट वेगाने करावे लागणार आह़े त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका:यांनी सोमवारी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांची भेट घेतली़ यापूर्वी मनपाच्या आयुक्तांच्या मागणीवरून ही योजना 27 ऑगस्ट 2015 ला मजीप्राकडे हस्तांतरित करण्यात आलेली आह़े

कागदपत्रांची केली तपासणी

पाणी योजनेच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी या समितीने केली़ दिवसभर समितीचे सदस्य मनपात उपस्थित होत़े त्यात निविदेपासून बिलांर्पयत सर्व कागदपत्रे तपासण्यात आली आहेत़ कागदपत्रे मजीप्राच्या ताब्यात दिली जाणार असून निधीदेखील वर्ग केला जाणार आह़े मजीप्राचे अधिकारी योजनेसाठी कामाला लागले आहेत़

वादळासह आव्हानांवर चर्चा

जर मार्चर्पयत मजीप्राने उर्वरित निधी खर्च केला नाही, तर हा निधी खर्च होऊ शकणार नाही़ जर हा निधी खर्च झाला नाही, तर योजनेचा पुढील हप्तादेखील मिळणार नाही. त्यामुळे ही योजना बारगळू शकत़े या योजनेसाठी मनपा अभियंता कैलास शिंदे हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत़ या योजनेत झालेले वादविवाद पाहता जर योजनेचा पुढील हप्ता मिळू शकला नाही, तर ही योजना अमृत योजनेंतर्गत पूर्ण करण्याची तयारी ठेवावी लागणार असून त्यानुषंगाने आयुक्तांनी मजीप्राच्या अधिका:यांशी चर्चा केली़ त्याचप्रमाणे योजनेच्या कामात आतार्पयत कसे वादळ आले व भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन योजनेचे काम दज्रेदार करण्याबाबतही चर्चा झाली़

समितीचा अहवाल नाहीच

पाणी योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी शहरात 10 ऑगस्टला आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परीक्षण समितीने अजूनही आपला अहवाल सादर केलेला नाही़ अहवाल मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असले तरीही अजून तो मनपास किंवा जिल्हाधिका:यांना प्राप्त झालेला नाही़ त्यामुळे 1 जानेवारीपासून योजनेच्या कामास सुरुवात केली जाणार असून प्रथम योजनेतील त्रुटींची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अहवाल आला नसताना कोणत्या त्रुटींमध्ये सुधारणा केली जाईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही़

चौकशीचे आव्हान कायम

पाणी योजनेच्या कामात झालेल्या वादविवादांची चौकशी सध्या जिल्हाधिका:यांकडून सुरू आह़े त्यानुसार योजनेतील कागदोपत्री व्यवहारांचा अहवाल जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाला सादर केला आह़े

तर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी मुंबईच्या आयआयटीशी चर्चा झाली आह़े त्यामुळे योजनेचे काम सुरू होताच आयआयटीची समितीही पाणी योजनेच्या कामांची तांत्रिक तपासणी करू शकत़े त्यामुळे मजीप्राला काम वेगाने करवून घेण्याबरोबरच त्याचा दर्जा खालावणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आह़े अन्यथा आयआयटीकडूनही पाणी योजनेच्या कामाचा पंचनामा होऊ शकतो़

‘डेडलाइन’ आह़े त्यानुषंगाने सोमवारी मजीप्राच्या टीमने आयुक्तांची भेट घेतली़