शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

पाणी योजनेला मार्चची ‘डेडलाइन’!

By admin | Updated: December 22, 2015 00:42 IST

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त

धुळे : शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेसाठी पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेला निधी जर मार्चअखेर खर्च झाला नाही, तर पुढील हप्ता मिळणार नसल्याची माहिती आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांनी दिली़ त्यामुळे आता मजीप्रासमोर योजनेचे काम मार्गी लावण्याचे आव्हान असून योजनेला मार्चर्पयत

योजनेचे काम अपूर्ण

शहरात राबविण्यात येत असलेल्या 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कामाला वर्ष उलटले आह़े 18 डिसेंबर 2014 रोजी या योजनेच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले होत़े परंतु या एक वर्षाच्या कालावधीपैकी सहा महिने काम बंदच आह़े 60 टक्के काम आतार्पयत झाल्याचा दावा ठेकेदाराने केला असला तरी अजून 40 टक्के कामही पूर्ण झालेले नाही़ शहरातील काही भागात जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत़ परंतु जलवाहिन्या टाकण्यासाठी वापरण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार झालेली आह़े त्यामुळे योजनेचे बंद असलेले काम सुरू करण्यापूर्वी आतार्पयत झालेल्या कामातील त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत़

तर दुसरीकडे कालावधी कमी असल्याने काम दुप्पट वेगाने करावे लागणार आह़े त्यानुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका:यांनी सोमवारी आयुक्त डॉ़नामदेव भोसले यांची भेट घेतली़ यापूर्वी मनपाच्या आयुक्तांच्या मागणीवरून ही योजना 27 ऑगस्ट 2015 ला मजीप्राकडे हस्तांतरित करण्यात आलेली आह़े

कागदपत्रांची केली तपासणी

पाणी योजनेच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी या समितीने केली़ दिवसभर समितीचे सदस्य मनपात उपस्थित होत़े त्यात निविदेपासून बिलांर्पयत सर्व कागदपत्रे तपासण्यात आली आहेत़ कागदपत्रे मजीप्राच्या ताब्यात दिली जाणार असून निधीदेखील वर्ग केला जाणार आह़े मजीप्राचे अधिकारी योजनेसाठी कामाला लागले आहेत़

वादळासह आव्हानांवर चर्चा

जर मार्चर्पयत मजीप्राने उर्वरित निधी खर्च केला नाही, तर हा निधी खर्च होऊ शकणार नाही़ जर हा निधी खर्च झाला नाही, तर योजनेचा पुढील हप्तादेखील मिळणार नाही. त्यामुळे ही योजना बारगळू शकत़े या योजनेसाठी मनपा अभियंता कैलास शिंदे हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत़ या योजनेत झालेले वादविवाद पाहता जर योजनेचा पुढील हप्ता मिळू शकला नाही, तर ही योजना अमृत योजनेंतर्गत पूर्ण करण्याची तयारी ठेवावी लागणार असून त्यानुषंगाने आयुक्तांनी मजीप्राच्या अधिका:यांशी चर्चा केली़ त्याचप्रमाणे योजनेच्या कामात आतार्पयत कसे वादळ आले व भविष्यात काय अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन योजनेचे काम दज्रेदार करण्याबाबतही चर्चा झाली़

समितीचा अहवाल नाहीच

पाणी योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी करण्यासाठी शहरात 10 ऑगस्टला आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परीक्षण समितीने अजूनही आपला अहवाल सादर केलेला नाही़ अहवाल मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत असले तरीही अजून तो मनपास किंवा जिल्हाधिका:यांना प्राप्त झालेला नाही़ त्यामुळे 1 जानेवारीपासून योजनेच्या कामास सुरुवात केली जाणार असून प्रथम योजनेतील त्रुटींची दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अहवाल आला नसताना कोणत्या त्रुटींमध्ये सुधारणा केली जाईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही़

चौकशीचे आव्हान कायम

पाणी योजनेच्या कामात झालेल्या वादविवादांची चौकशी सध्या जिल्हाधिका:यांकडून सुरू आह़े त्यानुसार योजनेतील कागदोपत्री व्यवहारांचा अहवाल जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी शासनाला सादर केला आह़े

तर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी मुंबईच्या आयआयटीशी चर्चा झाली आह़े त्यामुळे योजनेचे काम सुरू होताच आयआयटीची समितीही पाणी योजनेच्या कामांची तांत्रिक तपासणी करू शकत़े त्यामुळे मजीप्राला काम वेगाने करवून घेण्याबरोबरच त्याचा दर्जा खालावणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आह़े अन्यथा आयआयटीकडूनही पाणी योजनेच्या कामाचा पंचनामा होऊ शकतो़

‘डेडलाइन’ आह़े त्यानुषंगाने सोमवारी मजीप्राच्या टीमने आयुक्तांची भेट घेतली़