शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

दोन दिवसांत १२ तालुक्यात सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ...

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शनिवार, २० मार्च रोजी सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर तर २१ रोजी सात तालुक्यातील दोन हजार ६६८.५१ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून, दोन दिवसांत दोन हजार ६०७.५६ हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.

गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमधून बळीराजा सावरत नाही, तोच पुन्हा २० व २१ मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये २० रोजी जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यांत पिकांना मोठा फटका बसला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ रोजी यावल, रावेर, चाळीसगाव, जामनेर, चोपडा, अमळनेर, पारोळा या तालुक्यांना फटका बसला. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसान

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून, एक हजार ९०६ हेक्‍टरवरील पिके नष्ट झाली आहेत. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टरवर नुकसान झाले, तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८० हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. २१ रोजी चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस होऊन तेथे १२५.९० हेक्टर असे दोन दिवसांत एकूण १७१८.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या सोबत २१ रोजी सर्वाधिक ८६७.५० हेक्टरवर पारोळा तालुक्यात ७५९.२५ हेक्टरवर जामनेर तालुक्यात, अमळनेर तालुक्यात ५९७.५० हेक्टर, रावेर तालुक्यात ३०३०.५६ हेक्टर, चोपडा तालुक्यात १३.५० हेक्टर व यावल तालुक्यात १.४० हेक्टर असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान २१ रोजी नुकसान झाले.

सर्वाधिक फटका मक्याला

पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून, २० रोजी सहा तालुक्यात १३९१.२० हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. २१ रोजी पुन्हा १२१६.३६ हेक्टर असे एकूण २६०७.५६ हेक्टरवरील मक्याचे दोन दिवसांत नुकसान झाले. या सोबतच २० रोजी रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टरवरील फळपिके, २५५.४० हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा, ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे. २१ रोजी पुन्हा ४६९.५५ हेक्टरवरील ज्वारी, २५१.४० हेक्टरवरील गहू, २१३.३० हेक्टरवरील बाजरी, ५४.५० हेक्टरवरील हरभरा, ६७.८० हेक्टरवरील कांदा, ३.५० हेक्टरवरील तीळ, ०.१० हेक्टरवरील सूर्यफूल, १७ हेक्टरवरील शेवगा, ३९.६० हेक्टरवरील भाजीपाला, २१४.३० हेक्टरवरील केळी, सहा हेक्टरवरील पपई, १०२.६० हेक्टरवरील फळपिके, १२.५० हेक्टरवरील लिंबू असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

३२५ गावांतील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान

२० व २१ मार्च रोजी १२ तालुक्यात ३२५ गावातील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २० रोजी सहा तालुक्यांमधील ११२ गावांतील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे तर २१ रोजी २१३ गावातील तीन हजार ८८८ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून, तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.