शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत १२ तालुक्यात सात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:14 IST

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ...

जळगाव : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १२ तालुक्यांत सात हजार २०२०.८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये शनिवार, २० मार्च रोजी सहा तालुक्यातील चार हजार ५३४.३० हेक्‍टर तर २१ रोजी सात तालुक्यातील दोन हजार ६६८.५१ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक एक हजार ९०६ हेक्‍टरवर जळगाव तालुक्यात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये मक्‍याला सर्वाधिक फटका बसला असून, दोन दिवसांत दोन हजार ६०७.५६ हेक्‍टरवरील मका हातचा गेला आहे.

गेल्या महिन्यात १८ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमधून बळीराजा सावरत नाही, तोच पुन्हा २० व २१ मार्च रोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामध्ये २० रोजी जिल्ह्यातील जळगाव, बोदवड, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या सहा तालुक्यांत पिकांना मोठा फटका बसला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा २१ रोजी यावल, रावेर, चाळीसगाव, जामनेर, चोपडा, अमळनेर, पारोळा या तालुक्यांना फटका बसला. याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

जळगाव, चाळीसगाव तालुक्यात अधिक नुकसान

शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वाधिक नुकसान जळगाव तालुक्यातील झाले असून, एक हजार ९०६ हेक्‍टरवरील पिके नष्ट झाली आहेत. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात १५९२.९० हेक्‍टरवर नुकसान झाले, तसेच पाचोरा तालुक्यात ८६२.२० हेक्‍टर, बोदवड तालुक्यात ८९.४० हेक्‍टर, मुक्ताईनगर तालुक्यात ४६ हेक्‍टर, भडगाव तालुक्यात ३७.८० हेक्टरवर असे एकूण चार हजार ५३४.३० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. २१ रोजी चाळीसगाव तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस होऊन तेथे १२५.९० हेक्टर असे दोन दिवसांत एकूण १७१८.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या सोबत २१ रोजी सर्वाधिक ८६७.५० हेक्टरवर पारोळा तालुक्यात ७५९.२५ हेक्टरवर जामनेर तालुक्यात, अमळनेर तालुक्यात ५९७.५० हेक्टर, रावेर तालुक्यात ३०३०.५६ हेक्टर, चोपडा तालुक्यात १३.५० हेक्टर व यावल तालुक्यात १.४० हेक्टर असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान २१ रोजी नुकसान झाले.

सर्वाधिक फटका मक्याला

पिकांमध्ये सर्वाधिक फटका मक्‍याला बसला असून, २० रोजी सहा तालुक्यात १३९१.२० हेक्‍टरवरील मका नष्ट झाला आहे. २१ रोजी पुन्हा १२१६.३६ हेक्टर असे एकूण २६०७.५६ हेक्टरवरील मक्याचे दोन दिवसांत नुकसान झाले. या सोबतच २० रोजी रब्बी ज्वारीचे १०५४.५० हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. ६११.२० हेक्‍टर वरील गहू, ५१८.३० हेक्‍टरवरील फळपिके, २५५.४० हेक्‍टरवरील भाजीपाला, २३५ हेक्‍टर वरील केळी, २०९ हेक्‍टरवरील बाजरी, २०२.३० हेक्‍टरवरील हरभरा, ५०.९० हेक्‍टरवरील कांदा, ४.१० हेक्‍टरवरील तीळ, २.४० हेक्‍टरवरील मूग असा विविध पिकांना फटका बसला आहे. २१ रोजी पुन्हा ४६९.५५ हेक्टरवरील ज्वारी, २५१.४० हेक्टरवरील गहू, २१३.३० हेक्टरवरील बाजरी, ५४.५० हेक्टरवरील हरभरा, ६७.८० हेक्टरवरील कांदा, ३.५० हेक्टरवरील तीळ, ०.१० हेक्टरवरील सूर्यफूल, १७ हेक्टरवरील शेवगा, ३९.६० हेक्टरवरील भाजीपाला, २१४.३० हेक्टरवरील केळी, सहा हेक्टरवरील पपई, १०२.६० हेक्टरवरील फळपिके, १२.५० हेक्टरवरील लिंबू असे एकूण २६६८.५१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

३२५ गावांतील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान

२० व २१ मार्च रोजी १२ तालुक्यात ३२५ गावातील १० हजार ५७७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. २० रोजी सहा तालुक्यांमधील ११२ गावांतील एकूण सहा हजार ६८९ शेतकऱ्यांचे तर २१ रोजी २१३ गावातील तीन हजार ८८८ शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान ३३ टक्क्यांच्या वर असून, तसा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.