शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ३५० हून अधिक हेक्टर क्षेत्रावर नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे ...

जळगाव : शनिवार, २९ मे रोजी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर, चोपडा, यावल, बोदवड, एरंडोल तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पाच तालुक्यांमध्ये ३५०.३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली असून सर्वाधिक फटका केळीला बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान रावेर तालुक्यात झाले असून त्याखालोखाल यावल तालुक्यात नुकसान झाले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसत असून गुरुवारी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात दोन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्यानंतर शनिवारी पुन्हा अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने पाच तालुक्यांत नुकसान झाले.

रावेर तालुक्यात सलग नुकसान

शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे रावेर तालुक्‍यात १८९ हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे पीक नष्ट झाले. यासोबतच यावल तालुक्यात १२१.०४ हेक्टर, एरंडोल तालुक्यात २७ हेक्टर चोपडा तालुक्यात १० हेक्‍टर व बोदवड तालुक्यात २.५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये रावेर तालुक्यात गुरुवारी ७५७.६० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे पीक भुईसपाट झाले होते. त्यानंतर पुन्हा शनिवारी रावेर तालुक्याला चक्रीवादळाने घेरले व त्यात पुन्हा केळीच्या पिकाला फटका बसला.

पाच तालुक्यांतील ४२ गावे बाधित

शनिवारच्या चक्रीवादळामध्ये रावेर तालुक्यातील १४, चोपडा तालुक्यातील चार यावल १५, बोदवड पाच, एरंडोल चार अशा एकूण ४२ गावांमधील ३५१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

सर्वाधिक केळीचे क्षेत्र

शनिवारी केळी, पपई, पेरू, लिंबू, डाळिंब, या पिकांचे नुकसान झाले. यात ३२१.५५ हेक्टर वरील केळी, सात हेक्‍टरवरील लिंबू, २.१८ हेक्‍टरवरील डाळिंब व पेरू तसेच पपई यांचे प्रत्येकी एकेक हेक्‍टरवर नुकसान झाले आहे. या सर्व पिकांचे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर आहे.

या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. पहिला अहवाल शासनाला सादर होत नाही, तोच दुसरा फटका गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी शासनाकडे सादर केला. हा अहवाल सादर होत नाही, तोच पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात नुकसान झाले.