शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

निसर्गाने केला घात अन् पाठीराख्यांनी सोडली साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

सायगाव, ता.चाळीसगाव : सायगाव येथून जवळ असलेले मन्याड धरण एवढे अक्राळविक्राळ होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण निसर्गाच्या पुढे ...

सायगाव, ता.चाळीसगाव : सायगाव येथून जवळ असलेले मन्याड धरण एवढे अक्राळविक्राळ होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. पण निसर्गाच्या पुढे कोणीही नाही. अशीच सर्वात मोठी घटना घडली ती नांद्रे या अत्यंत छोटेशा गावात.

मन्याड धरणात अचानक वाढ झाली. त्याअगोदर मंगळवारी रात्री गावातील नातलगांना बिरोळे आणि सावरगाव येथून फोन आले आणि तुम्ही सावध राहा, मन्याड धरणात वाढ होत आहे आणि नांद्रे येथील ग्रामस्थांना धरणाचे अक्राळविक्राळ रूपचे संकेत मिळाले होते. तेवढ्यात भयानक पुराने थैमान घातले आणि नांद्रे येथील पुलाजवळील खालचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला आणि नांद्रे गावाचा संपर्क तुटला. विज गूल झाली आणि गावांतील लहान मुले, महिला, म्हातारे सर्वांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहत होत्या. आता काय होणार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता वाटत होती.

अजून लोकप्रतिनिधी फिरकलेच नाही

एवढा मोठा प्रसंग नांद्रे या छोट्याशा गावावर आला. प्रत्येकाच्या डोळ्यात आसू होते. हातावर मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब लोकांना खायला अन्न नाही, गुराढोरांना चारा नाही आणि नांद्र्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाईट प्रसंग आला. अजून आमदार मंगेश चव्हाणवगळता एकही प्रतिनिधी नांद्रे गांवी भेट द्यायला आलेला नाही. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हेदेखील जवळ येऊन नांद्रे गावाकडे फिरकले नाही. नांद्रे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णत: पाण्यात वाहून गेला असून, सध्या तिथे काम चालू आहे.

..आम्हाला मदत पाहिजे

नांद्रे या गावात सध्या पुराच्या पाण्याने होरपळून निघालेल्या ग्रामस्थांच्या मनामध्ये अजूनदेखील भीतीचे वातावरण असून, त्यांना पूर्वपदावर येण्यासाठी भरपूर वेळ लागणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. नांद्रे येथे फक्त प्रांत तहसीलदार यांनी येऊन भेट दिली आहे. नांद्रे येथे जाण्या-येण्यासाठी सध्या तात्पुरता रस्त्याचे काम सुरू आहे.

कॉंक्रिटीकरणाच्या भिंतीची मागणी

नांद्रे गावाला धोका पोहोचला तो मन्याड धरणाच्या सांडव्याजवळील मातीच्या भरावामुळेच. मातीचा भराव फुटल्याने संपूर्ण पाण्याने नांद्र्याला वेढा दिला आणि सर्व नांद्रे येथील खालच्या नदी काठची घरे पाण्याखाली गेल्याने सर्व धान्य व इतर संसार वाहून गेला. आज खायला अन्न नाही. त्यामुळे शासनाने मातीचा भराव न करता तेथे मजबूत काँक्रिटीकरणाची भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नांद्रे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

तात्काळ नुकसानभरपाईची मागणी

नांद्रे गावाला मन्याड धरणाने सर्वात मोठा तडाखा दिल्याने गावातील घरांचे नुकसान तर झालेच; परंतु शेतीचे सर्वात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अक्षरशः मका, कापूस, ऊस व इतर पिके पूर्णत: वाहून गेली. एवढेच नव्हे शेतात मातीदेखील नाही. या नुकसानाची कधीच पोकळी भरून निघणार नाही. त्यामुळे शासनाने पंचनामे तर पूर्ण केले. आता फक्त तात्काळ मदत देण्यात यावी आणि नांद्रे गाव लवकरात लवकर पूर्वपदावर आणावे, अशी मागणी होत आहे.