शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात दोघा बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

(‘सीडी’साठी) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

(‘सीडी’साठी)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मौजे अंचलवाडी येथे चिंचेचे झाड अंगावर कोसळून दोघा बहिणींचा तर पळास खेडे येथील एका शेतकऱ्याचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यातील ५०० हेक्‍टरवरील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता निसर्गानेदेखील कोणतीही कसर सोडली नसून, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व कोकण किनारपट्टीसह जळगाव जिल्ह्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून ज्योती बल्लू बारेला व रोशनी बल्लू बारेला या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर पळासदे येथे बांधकामातील पत्रे व विटा अंगावर कोसळून दिलीप भादूगीर गोसावी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत केळीव्यतिरिक्त शेतांमध्ये कोणतेही पीक नसल्याने शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी जळगाव, चोपडा तालुक्यातील काही गावांमधील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शेतात ठेवलेला चारादेखील ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील विद्युत खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच फिडरवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव, अमळनेर, चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये २४ ते ३२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.