शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यात दोघा बहिणींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

(‘सीडी’साठी) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

(‘सीडी’साठी)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जळगाव जिल्ह्यातदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील मौजे अंचलवाडी येथे चिंचेचे झाड अंगावर कोसळून दोघा बहिणींचा तर पळास खेडे येथील एका शेतकऱ्याचा या वादळामुळे मृत्यू झाला आहे. यासह जिल्ह्यातील ५०० हेक्‍टरवरील केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात आता निसर्गानेदेखील कोणतीही कसर सोडली नसून, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने गुजरात व कोकण किनारपट्टीसह जळगाव जिल्ह्याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून ज्योती बल्लू बारेला व रोशनी बल्लू बारेला या दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. तर पळासदे येथे बांधकामातील पत्रे व विटा अंगावर कोसळून दिलीप भादूगीर गोसावी या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात सद्य:स्थितीत केळीव्यतिरिक्त शेतांमध्ये कोणतेही पीक नसल्याने शेतीचे फार नुकसान झाले नसले तरी जळगाव, चोपडा तालुक्यातील काही गावांमधील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या कांदे बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शेतात ठेवलेला चारादेखील ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील विद्युत खांब व तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच फिडरवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जळगाव, अमळनेर, चोपडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये २४ ते ३२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता.