शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

नियोजनाअभावी पिकांना फटका

By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : मका-बाजरी धोक्यात, गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी

आडगाव, ता. चाळीसगाव : मन्याड धरणातून नुकतेच पाण्याचे तिसरे आवर्तन सोडले गेले. त्याचा लाभ मोजक्याच शेतकºयांना झाला असून उर्वरित शेतकºयांचे मका-बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाटचारी क्रमांक ११ व देवळी मायनरवरील शेतकºयांना  मोठा फटका बसला आहे.  याला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब गोविंदा पाटील, किरण शिवाजी पाटील, अविनाश सदाशिव पाटील, जालिंदर जगन्नाथ पाटील, विनोद तुकाराम पाटील आदींनी केला आहे.पाणी नियोजन हुकलेधरण यंदा १०० टक्के भरल्याने तीन-चार आवर्तने अपेक्षित होती, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे केवळ दोन आवर्तने व्यवस्थित मिळाली. तिसरे आवर्तन लवकर देऊन एक नंबर सेक्शनला पाणी टाकण्याची घाई केली व इकडचे शेतकरी काही जेवले तर काही उपाशी राहिले. एक नंबर सेक्शनला पाणी विकल्याचा आरोपदेखील वरील शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे                आहे.गिरणेला आवर्तन मग मन्याड नदीत पाणी कसे?मन्याड धरणातून ५० ते ६० क्युसेसचा प्रवाह सुरू आहे. यातील ४० क्युसेस पाणी चारी क्रमांक  ६ ला सुरू आहे तर उर्वरित २० क्युसेस पाणी सायगावच्या मन्याड नदीत सोडले आहे. इकडे शेतकरी पिकांना पाणी भरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे पाणी या चारीला व नदीला सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता धरणात पाणीच शिल्लक  नाही. तुमच्यापर्यंत पाणी येणे शक्य नाही असे बोलले जात आहे.                                    पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले असते तर चारी क्रमांक  ६ पासून तर १२ पर्यंत  सर्व चारींना किमान चार-पाच दिवस पाणी चालले असते. शिवाय भरणा क्षेत्रदेखील कमी झाले होते.  परंतु मेन कॅनॉलवर कुणाचाही अंकुश नसल्याने वाटेल तेव्हा मनाला पटेल त्याप्रमाणे पाणी लावताना प्रत्यक्ष पाहणीवरून दिसले. याशिवाय मेन कॅनालला अर्धवट कोरुन बºयाच शेतकºयांनी पाईप टाकून पाणी चोरी केल्याचे दिसून आले. काही शेतकºयांनी विहिरींना पाणी उतरावे म्हणून नाले, डबके, केटीवेअर भरून घेतले. अशा पाणी चोरांवर पाटबंधारे विभागाने काय कारवाई केली, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.