शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नियोजनाअभावी पिकांना फटका

By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST

पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : मका-बाजरी धोक्यात, गाव तलावात पाणी सोडण्याची मागणी

आडगाव, ता. चाळीसगाव : मन्याड धरणातून नुकतेच पाण्याचे तिसरे आवर्तन सोडले गेले. त्याचा लाभ मोजक्याच शेतकºयांना झाला असून उर्वरित शेतकºयांचे मका-बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे पाटचारी क्रमांक ११ व देवळी मायनरवरील शेतकºयांना  मोठा फटका बसला आहे.  याला पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप रावसाहेब गोविंदा पाटील, किरण शिवाजी पाटील, अविनाश सदाशिव पाटील, जालिंदर जगन्नाथ पाटील, विनोद तुकाराम पाटील आदींनी केला आहे.पाणी नियोजन हुकलेधरण यंदा १०० टक्के भरल्याने तीन-चार आवर्तने अपेक्षित होती, परंतु पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे केवळ दोन आवर्तने व्यवस्थित मिळाली. तिसरे आवर्तन लवकर देऊन एक नंबर सेक्शनला पाणी टाकण्याची घाई केली व इकडचे शेतकरी काही जेवले तर काही उपाशी राहिले. एक नंबर सेक्शनला पाणी विकल्याचा आरोपदेखील वरील शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे आमच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांचे म्हणणे                आहे.गिरणेला आवर्तन मग मन्याड नदीत पाणी कसे?मन्याड धरणातून ५० ते ६० क्युसेसचा प्रवाह सुरू आहे. यातील ४० क्युसेस पाणी चारी क्रमांक  ६ ला सुरू आहे तर उर्वरित २० क्युसेस पाणी सायगावच्या मन्याड नदीत सोडले आहे. इकडे शेतकरी पिकांना पाणी भरण्यासाठी धडपडत आहे तर दुसरीकडे पाणी या चारीला व नदीला सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना विचारले असता धरणात पाणीच शिल्लक  नाही. तुमच्यापर्यंत पाणी येणे शक्य नाही असे बोलले जात आहे.                                    पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केले असते तर चारी क्रमांक  ६ पासून तर १२ पर्यंत  सर्व चारींना किमान चार-पाच दिवस पाणी चालले असते. शिवाय भरणा क्षेत्रदेखील कमी झाले होते.  परंतु मेन कॅनॉलवर कुणाचाही अंकुश नसल्याने वाटेल तेव्हा मनाला पटेल त्याप्रमाणे पाणी लावताना प्रत्यक्ष पाहणीवरून दिसले. याशिवाय मेन कॅनालला अर्धवट कोरुन बºयाच शेतकºयांनी पाईप टाकून पाणी चोरी केल्याचे दिसून आले. काही शेतकºयांनी विहिरींना पाणी उतरावे म्हणून नाले, डबके, केटीवेअर भरून घेतले. अशा पाणी चोरांवर पाटबंधारे विभागाने काय कारवाई केली, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.