शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

शासनाचे आदेश नसताना कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता सीसीआयने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव, सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिलीभगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शासनाने ५७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा चांगला माल विक्रीसाठी येऊ लागल्यानंतर आता कापसाची प्रत खालावली असल्याचे कारण देत हमीभावात तब्बल ११५ रुपयांची घट केली आहे. तसेच आर्द्रतेचे कारण देत सीसीआयच्या केंद्रावर कापसावर कट्टी लावण्याचे धोरण देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून सीसीआयच्या मनमानी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

मंगळवारी शेतकरी आपला माल घेऊन आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर माल घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सीसीआयने भावात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच ग्रेड लावून कट्टी लावल्यास सीसीआय विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे भावात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच दर कमी केले, असा आरोप आव्हाणे येथील प्रगतिशील शेतकरी भगवान श्रीधर चौधरी यांनी केला.

शेतकऱ्यांची फिरवा-फिरव

जळगाव शहर व तालुक्यासाठी आव्हाणे येथील तीन जिनिंगमध्ये सीसीआयकडून माल खरेदी केला जात आहे. मात्र, एक दिवस एका जिनिंगमध्ये तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेतला जातो. अशाप्रकारे रोटेशन सिस्टीमने मालाची खरेदी केली जात आहे. मात्र, सीसीआयकडून हे निर्णय ऐनवेळी बदलले जात असल्याने शेतकऱ्यांना एका जिनिंगकडून दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेऊन फिरावे लागत आहे. अनेक शेतकरी तीन दिवसांपासून मालाने भरून आणलेल्या ट्रकसह रांगेत उभे राहत आहेत.

व्यापाऱ्यांना प्राधान्य, शेतकरी रांगेत

सीसीआयच्या केंद्रावर देखील व्यापाऱ्यांचे काही दलाल सक्रिय झाले असून, व्यापाऱ्यांच्या मालाला टोकण देऊन त्यांचा क्रमांक पुढे लावला जात आहे. यामुळे सीसीआयच्या केंद्रावर मंगळवारी काही प्रमाणात गोंधळदेखील झाला. शेतकरी प्रामाणिकपणे रांगेत उभा राहून आपला माल विक्रीसाठी आणत असताना जिनिंगमध्ये त्याच्याआधी व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करू नका

सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच भावात ११५ रुपये कमी केल्याने बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे. तसेच हमीभावात घट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेऊन खुलासा सादर करण्याच्या सूचना बाजार समितीने सीसीआय प्रशासनाला दिल्या आहेत.