शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे आदेश नसताना कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत असताना दुसरीकडे मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता सीसीआयने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव, सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिलीभगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. शासनाने ५७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा चांगला माल विक्रीसाठी येऊ लागल्यानंतर आता कापसाची प्रत खालावली असल्याचे कारण देत हमीभावात तब्बल ११५ रुपयांची घट केली आहे. तसेच आर्द्रतेचे कारण देत सीसीआयच्या केंद्रावर कापसावर कट्टी लावण्याचे धोरण देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून सीसीआयच्या मनमानी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

मंगळवारी शेतकरी आपला माल घेऊन आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर माल घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी सीसीआयने भावात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच ग्रेड लावून कट्टी लावल्यास सीसीआय विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे भावात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच दर कमी केले, असा आरोप आव्हाणे येथील प्रगतिशील शेतकरी भगवान श्रीधर चौधरी यांनी केला.

शेतकऱ्यांची फिरवा-फिरव

जळगाव शहर व तालुक्यासाठी आव्हाणे येथील तीन जिनिंगमध्ये सीसीआयकडून माल खरेदी केला जात आहे. मात्र, एक दिवस एका जिनिंगमध्ये तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेतला जातो. अशाप्रकारे रोटेशन सिस्टीमने मालाची खरेदी केली जात आहे. मात्र, सीसीआयकडून हे निर्णय ऐनवेळी बदलले जात असल्याने शेतकऱ्यांना एका जिनिंगकडून दुसऱ्या जिनिंगमध्ये माल घेऊन फिरावे लागत आहे. अनेक शेतकरी तीन दिवसांपासून मालाने भरून आणलेल्या ट्रकसह रांगेत उभे राहत आहेत.

व्यापाऱ्यांना प्राधान्य, शेतकरी रांगेत

सीसीआयच्या केंद्रावर देखील व्यापाऱ्यांचे काही दलाल सक्रिय झाले असून, व्यापाऱ्यांच्या मालाला टोकण देऊन त्यांचा क्रमांक पुढे लावला जात आहे. यामुळे सीसीआयच्या केंद्रावर मंगळवारी काही प्रमाणात गोंधळदेखील झाला. शेतकरी प्रामाणिकपणे रांगेत उभा राहून आपला माल विक्रीसाठी आणत असताना जिनिंगमध्ये त्याच्याआधी व्यापाऱ्यांचा माल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करू नका

सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच भावात ११५ रुपये कमी केल्याने बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे. तसेच हमीभावात घट केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे याबाबत त्वरित निर्णय घेऊन खुलासा सादर करण्याच्या सूचना बाजार समितीने सीसीआय प्रशासनाला दिल्या आहेत.