शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
3
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
4
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
5
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
7
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
8
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
9
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
10
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
11
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
12
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
13
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
14
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
15
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
16
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
17
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
18
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
19
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१७ महिन्यांपासून मनपाचे ‘ते’ खाते सीलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:18 IST

जळगाव : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचा २ कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर २०१९ मध्ये ...

जळगाव : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेचा २ कोटी रुपयांचा निधी सप्टेंबर २०१९ मध्ये गोठवला होता. आता १७ महिन्यांनंतर देखील २ कोटींचा निधी असलेले खाते सीलच आहेत. दरम्यान, जोपर्यंत मलनिस्सारण योजना पुर्ण होणार नाही तोपर्यंत हा निधी गोठवलेलाच राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मलनिस्सारण योजनेच्या कामाला झालेल्या उशीरमुळे हरित लवादाने ही कारवाई केली आहे.

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट

जळगाव - शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलनिस्सारण योजनेचे काम अंत्यत निकृष्ट दर्ज्याप्रमाणे सुरु आहे. बहतेक काम हे डस्ट मध्येच करण्यात आले असून, काही ठिकाणच्या तक्रारीनंतर ठराविक कामच वाळुव्दारे करण्यात आले आहे. तसेच संपुर्ण योजनेच्या कामावर देखरेख ठेवण्याचे काम मनपातील एकाच अभियंतावर सोपविण्यात आले असून, यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा शहरातील अमोल कोल्हे यांनी केला आहे. याबाबत कोल्हे यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

शेतकऱ्यांचा विरोधानंतर हमाली दरात १० टक्केच वाढ

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली दराच्या करारात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. हमाल-मापाडी संघटनेकडून ३० टक्के दरवाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी किशोर चौधरी, मिलिंद चौधरी यांनी ही वाढ करू नये अशी मागणी केली होती. त्यातच वाढ होत नसल्याने हमाल मापाडी संघटनेने ९ दिवसांपासून बंद पुकारला होता. बाजार समितीने शनिवारी १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हमाल मापाडी संघटनेने बंद मागे घेतला आहे. शेतकऱ्यांचेही नुकसान नाही व हमाल-मापाडींचेही नुकसान नाही असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सभापती कैलास चौधरी यांनी दिली.

शिवाजीनगरातील ‘ती’ जलवाहिनी हलवली

जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी महापालिकेने शनिवारी हटवली. यामुळे पुलाच्या तटबंदीच्या कामाला गती येऊ शकेल. दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. पुलाच्या मार्गातील मनपाच्या जलवाहिन्या व महावितरणचे दुभाजकांमधील विद्युत पोल अडथळा ठरत असल्याने त्यांचे स्थलांतराअभावी काम ठप्प झाले होते. ही जलवाहिनी हलविल्यामुळे आता पुन्हा पुलाच्या कामाला गती येणार आहे.