शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर नियंत्रण, आता लसीकरण व म्युकरमायकोसिसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात ...

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता समोर येत आहेत. गेल्यावर्षी ज्याप्रमाणे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले तसेच आतादेखील कोरोनाच्या संकटावर मात करण्यामध्ये यश आले आहे. कोरोना पूर्णपणे गेला असे नाही, मात्र दररोजची रुग्णसंख्या २० ते २५ टक्क्यांवर येण्यासह मृत्यूंचे प्रमाण व बाधित रुग्णांची संख्यादेखील घटली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांचे हे फळ म्हणावे लागेल. मात्र, आता प्रशासनापुढे पुन्हा दुसरे संकट म्युकरमायकोसिसच्या रुपाने उभे राहिले आहे. यासोबतच लसीचा तुटवडा हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरत असून, येणाऱ्या लसींमध्ये प्रशासनाला नियोजन करावे लागत आहे. एप्रिल महिन्यात एका दिवसात १,२००च्या पुढे कोरोनाची रुग्णसंख्या गेली व जिल्ह्यात पुन्हा एकदा संकट उभे राहिले. या काळात बेड उपलब्ध न होणे, ऑक्सिजन न मिळणे, व्हेंटिलेटरचा तुटवडा, रेमडेसिविरसाठी पळापळ यामुळे जिल्हावासीयांची चांगलीच दमछाक झाली. यामध्ये प्रशासनाला ऑक्सिजन असो की रेमडेसिविरसाठी नियोजन करत ते प्रशासनाच्या नियंत्रणाखालीच वितरीत केले जाऊ लागले. हे सर्व करत असताना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्यात आले. मात्र, यातून गर्दी पाहिजे त्या प्रमाणात कमी झाली नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले. यात कारवाईदेखील वाढली व नागरिक बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले. या सर्व उपाययोजनांचे परिणाम समोर येऊन आता दररोजची रुग्णसंख्या ३५० ते ४००वर आली आहे. कोरोनावर तर नियंत्रण मिळवले, मात्र त्यापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसने डोके वर काढल्याने त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये या आजारावर आवश्यक असलेल्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याने त्याची माहिती प्रशासनाला देण्याचे निर्देश देण्यात आले व त्याच्या पुरवठ्यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, या रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एकीकडे हे आव्हान असताना, जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस येत नसल्याने त्यासाठीही कसरत करावी लागत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात तर सलग दोन दिवस लसीकरण बंद राहिले. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य शासनाने फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांचेच लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आता १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले. मात्र, गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांनाही पुरणार नाहीत, इतके कमी डोस जिल्ह्याला मिळाले. लसीचा तुटवडा असाच राहिला तर संपूर्ण लसीकरण कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. गेल्या आठवड्याची स्थिती पाहता, मंगळवारी दिवसभरात फक्त ४७७ जणांना लसीचा डोस मिळाला व जिल्ह्यात केवळ ४०० डोस शिल्लक होते. जिल्ह्यात मंगळवारी अनेक केंद्रांवर लसच शिल्लक नव्हती. जळगाव शहरात तर १४ मे रोजी १,०३४ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. नंतर १६ मे रोजी हा आकडा १,५३२वर गेला होता. मात्र, सोमवार, १७ मे रोजी १,०४६ जणांचे तर मंगळवार, १८ मे रोजी फक्त १६८ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. आता लसीकरणात सातत्य येत असले तरी भविष्यात ते कायम राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.