शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

कोरोना विषाणूचा पाणी जार व्यवसायावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून विविध उद्योग, व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या लाटेत आता पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून विविध उद्योग, व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या लाटेत आता पाणी जार पुरवण्याचा व्यवसाय अडचणीत आला असून मार्च २०२० पूर्वीच्या व्यवसायाच्या तुलनेत आता फक्त २० ते २२ टक्के व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आता हे पाणी फिल्टर करून ते जारमध्ये भरणाऱ्या उत्पादकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मार्च २०१९ मध्ये जळगाव शहरातील सुमारे १२० उत्पादक मिळून शहरात दिवसाला १२ हजाराच्या वर जारची विक्री करत होते. त्यातून उत्पादक तसेच त्यांचे कामगार, वाहतूक करणारे अशा सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न सुटत होता. पाणी घेऊन त्याला फिल्टर करून चिलरमधून काढून ते थंड केल्यावर जारमध्ये भरले जाते. शहरातील अनेक कार्यालये, लग्न सोहळे, विविध कार्यक्रम या ठिकाणी हे पाणी जार पुरवले जात होते. लग्नाला हजारावर पाहुणे येणार असतील तर पाण्याचे जारदेखील जास्त लागत होते. मात्र आता लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने तेथे जार लागत नाहीत. कार्यालयेदेखील बंद आहेत. जे नागरिक घरी पिण्यासाठी जारचे पाणी मागवत होते त्यांनीदेखील घरात आरओ बसवून घेतले आहेत. त्यामुळे जारचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यासारखाच आहे.

इंधन दरांनीही येतेय अडचण

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढले आहे. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस वाढले असले तरी पाणी जारचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळेही उत्पादक आणि वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे.

जारची स्थिती (प्रति दिवस)

मार्च - २०१९ - १२०००

मार्च २०२० - ११०००

मार्च २०२१- २४००

एकूण उत्पादक १२०

दर महिन्याला होणाऱ्या व्यवसायात तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आम्ही दर दिवसाला १०० पेक्षा जास्त जारची विक्री करत होतो. मात्र आता दर दिवसाला फक्त २० ते २५ जारची विक्री होत आहे. लग्न सोहळे, कार्यक्रम, कार्यालये बंद आहेत. त्यामुळे पाणी घेणार तरी कोण, असा प्रश्न आहे.

- वैभव डिमके, अध्यक्ष, पाणी जार जळगाव शहर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आम्ही पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे. त्याऐवजी घरीच फिल्टर बसवण्याचा आमचा विचार आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही बाटलीबंद पाणी बाहेरून मागवण्यापेक्षा साधेच पाणी पितो.

- कुणाल साखरे

सध्या बाहेरून पाणी आणणे किंवा कुणाला तरी त्यासाठी घरी बोलवणे योग्य नाही. त्यातून संसर्गाची शक्यता पाहता आम्ही साधे पाणी पिण्यालाच प्राधान्य देत आहोत. पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे.

- अश्विन पाटील