शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूचा पाणी जार व्यवसायावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षभरापासून विविध उद्योग, व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या लाटेत आता पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षभरापासून विविध उद्योग, व्यवसायांना मंदीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या लाटेत आता पाणी जार पुरवण्याचा व्यवसाय अडचणीत आला असून मार्च २०२० पूर्वीच्या व्यवसायाच्या तुलनेत आता फक्त २० ते २२ टक्के व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आता हे पाणी फिल्टर करून ते जारमध्ये भरणाऱ्या उत्पादकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मार्च २०१९ मध्ये जळगाव शहरातील सुमारे १२० उत्पादक मिळून शहरात दिवसाला १२ हजाराच्या वर जारची विक्री करत होते. त्यातून उत्पादक तसेच त्यांचे कामगार, वाहतूक करणारे अशा सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न सुटत होता. पाणी घेऊन त्याला फिल्टर करून चिलरमधून काढून ते थंड केल्यावर जारमध्ये भरले जाते. शहरातील अनेक कार्यालये, लग्न सोहळे, विविध कार्यक्रम या ठिकाणी हे पाणी जार पुरवले जात होते. लग्नाला हजारावर पाहुणे येणार असतील तर पाण्याचे जारदेखील जास्त लागत होते. मात्र आता लग्न सोहळ्यातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने तेथे जार लागत नाहीत. कार्यालयेदेखील बंद आहेत. जे नागरिक घरी पिण्यासाठी जारचे पाणी मागवत होते त्यांनीदेखील घरात आरओ बसवून घेतले आहेत. त्यामुळे जारचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यासारखाच आहे.

इंधन दरांनीही येतेय अडचण

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाचे दर वाढले आहे. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस वाढले असले तरी पाणी जारचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळेही उत्पादक आणि वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे.

जारची स्थिती (प्रति दिवस)

मार्च - २०१९ - १२०००

मार्च २०२० - ११०००

मार्च २०२१- २४००

एकूण उत्पादक १२०

दर महिन्याला होणाऱ्या व्यवसायात तब्बल ८० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आम्ही दर दिवसाला १०० पेक्षा जास्त जारची विक्री करत होतो. मात्र आता दर दिवसाला फक्त २० ते २५ जारची विक्री होत आहे. लग्न सोहळे, कार्यक्रम, कार्यालये बंद आहेत. त्यामुळे पाणी घेणार तरी कोण, असा प्रश्न आहे.

- वैभव डिमके, अध्यक्ष, पाणी जार जळगाव शहर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आम्ही पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे. त्याऐवजी घरीच फिल्टर बसवण्याचा आमचा विचार आहे. सध्याची परिस्थिती पाहता आम्ही बाटलीबंद पाणी बाहेरून मागवण्यापेक्षा साधेच पाणी पितो.

- कुणाल साखरे

सध्या बाहेरून पाणी आणणे किंवा कुणाला तरी त्यासाठी घरी बोलवणे योग्य नाही. त्यातून संसर्गाची शक्यता पाहता आम्ही साधे पाणी पिण्यालाच प्राधान्य देत आहोत. पाण्याचे जार घरी मागवणे बंद केले आहे.

- अश्विन पाटील