शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कोरोनाने पळविला जळगावातील उष्माघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

- स्टार : 726 जिल्ह्यात दोन वर्षात उष्माघाताचे बळी नाही : संचारबंदीमुळे नागरिक घरातच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

- स्टार : 726

जिल्ह्यात दोन वर्षात उष्माघाताचे बळी नाही : संचारबंदीमुळे नागरिक घरातच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सुरु झाले. त्यानंतर २२ मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे सर्वच जण घरात थांबून आहेत. आता पुन्हा एकदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने या दोन वर्षात उष्माघाताच्या एकाही बळींची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे झालेली नाही.

गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कोरोनाशी लढा देत आहे. तसेच लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत. कुणीही बाहेर फिरु शकत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या एकदम कमी झाली आहे. नागरिक घराबाहेर निघाले तर बहुतेक ठिकाणी त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस उभे असतात. त्यामुळे सर्वच जण घरीच आहेत. उन्हात कुणीही भटकत नसल्याने चांगला परिणाम असा झाला की गेल्या २०२० च्या उन्हाळ्यात आणि यंदाच्या उन्हाळ्यात देखील उष्माघाताचे फारसे रुग्ण समोर आलेले नाहीत.

तापमानही चाळीसच्या आसपास

दरवर्षी उन्हाळ्यात जळगावचे तापमान चाळीसच्या पुढे असते. यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा जळगावकरांसाठी काहीसा फायदेशीर ठरला. जळगावला ८ मे रोजी ४० अंश सेल्सीअस तापमान होते. त्या व्यतिरिक्त इतर दिवस तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस एवढेच होते. असे असले तरी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा मात्र जळगावकरांसाठी त्रासदायकच होता. या आठवड्यात कमाल तापमान हे ४० होते. तर किमान तापमान देखील २५ ते २६ अंशांच्या जवळ होते. यंदा वातावरणात देखील बदल होत असल्याने यंदाचा उन्हाळा फारसा त्रासदायक ठरलेला नाही.

उन्हाळा घरातच

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिक अत्यावश्यक कामे वगळता घरातच आहेत. त्यामुळे यंदा जळगावकरांना उन्हाचे चटके बसलेले नाही.