शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कोरोनाने पळविला जळगावातील उष्माघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST

- स्टार : 726 जिल्ह्यात दोन वर्षात उष्माघाताचे बळी नाही : संचारबंदीमुळे नागरिक घरातच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ...

- स्टार : 726

जिल्ह्यात दोन वर्षात उष्माघाताचे बळी नाही : संचारबंदीमुळे नागरिक घरातच

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनाचे रुग्ण सुरु झाले. त्यानंतर २२ मार्च पासून देशभरात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे सर्वच जण घरात थांबून आहेत. आता पुन्हा एकदा एप्रिल महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने या दोन वर्षात उष्माघाताच्या एकाही बळींची नोंद जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे झालेली नाही.

गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कोरोनाशी लढा देत आहे. तसेच लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत. कुणीही बाहेर फिरु शकत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताच्या रुग्णांची संख्या एकदम कमी झाली आहे. नागरिक घराबाहेर निघाले तर बहुतेक ठिकाणी त्यांच्यावर कारवाईसाठी पोलीस उभे असतात. त्यामुळे सर्वच जण घरीच आहेत. उन्हात कुणीही भटकत नसल्याने चांगला परिणाम असा झाला की गेल्या २०२० च्या उन्हाळ्यात आणि यंदाच्या उन्हाळ्यात देखील उष्माघाताचे फारसे रुग्ण समोर आलेले नाहीत.

तापमानही चाळीसच्या आसपास

दरवर्षी उन्हाळ्यात जळगावचे तापमान चाळीसच्या पुढे असते. यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा जळगावकरांसाठी काहीसा फायदेशीर ठरला. जळगावला ८ मे रोजी ४० अंश सेल्सीअस तापमान होते. त्या व्यतिरिक्त इतर दिवस तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस एवढेच होते. असे असले तरी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा मात्र जळगावकरांसाठी त्रासदायकच होता. या आठवड्यात कमाल तापमान हे ४० होते. तर किमान तापमान देखील २५ ते २६ अंशांच्या जवळ होते. यंदा वातावरणात देखील बदल होत असल्याने यंदाचा उन्हाळा फारसा त्रासदायक ठरलेला नाही.

उन्हाळा घरातच

गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे नागरिक अत्यावश्यक कामे वगळता घरातच आहेत. त्यामुळे यंदा जळगावकरांना उन्हाचे चटके बसलेले नाही.