शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर अंकुश ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून खासगी रुग्णालयेदेखील फुल्ल झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून खासगी रुग्णालयेदेखील फुल्ल झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारणी केली जात असून या रुग्णालयांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून एक समिती गठित करण्याचे आश्वासन दिले आहे.

कोरोना संदर्भातील विविध विषयांबाबत शुक्रवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली. शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जळगावात अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णांवर उपचार करताना शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार बिलाची आकारणी न करता लाखोंची बिल काढले जात असल्याचे महापौरांनी सांगितले.

समिती गठित करणार

जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भात लवकरच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व मनपा अधिकारी यांची एकत्रित समिती गठित करण्यात येऊन रुग्णालयांची तपासणी करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच जर कुणाकडून अधिकचे बिल आकारणी केले असल्यास त्याची बिले आमच्याकडे सादर केल्यास आकारणी केलेली अतिरिक्त रक्कम देखील परत मिळवून देऊ असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

स्वयंसेवी संस्थांना रेमडेसिवीर उपलब्ध करून द्या

जिल्हा प्रशासनाने रेमडेसिवीर इंजेक्शन कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल असे सांगितले आहे. परंतु तरीही नागरिकांची इंजेक्शनसाठी फिरफिर होत आहे. नागरिकांचा त्रास वाचावा यासाठी एखादी समिती नेमून त्यामाध्यमातून इंजेक्शन वितरित करण्यात यावे. तसेच जळगावात काही सामाजिक संस्था अल्पदराने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देत आहे अशा संस्थांना साठा उपलब्ध करून देत विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गृह विलगीकरणाबाबत फेरविचार करावा

शहरात कोरोना बाधित रुग्णाला गृह विलगीकरणाची परवानगी देताना त्या अर्जावर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांची स्वाक्षरी आवश्यक असते. डॉक्टरने उपचार करताना रुग्णाची दररोज घरी जाऊन काळजी घेणे आणि उपचार करणे गरजेचे असते, परंतु सध्या शहरात असे काही होत असल्याचे दिसून येत नाही. नागरिकांचे हित आणि कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गृहविलगीकरणाची परवानगी देण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.