शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली. काँग्रेसला मानणारा मोठा गट सहकार क्षेत्रात असून, याचा फायदा येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसला होईल अशी आशादेखील ॲड. संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. रविवारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी काँग्रेस भवनात काँग्रेसच्या जिल्हाभरातील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, डी. जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. सुरेश पाटील, आर. जी. पाटील, माजी आमदार रमेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. काँग्रेसची ताकद सहकार क्षेत्रात वाढावी म्हणून जिल्हाभरातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा आग्रह असल्याने ही निवडणूक स्वबळावरच लढविण्याची तयारी झाली असल्याची माहिती ॲड. संदीप पाटील यांनी दिली.

२१ जागा लढण्याची तयारी

जिल्हा बँकेच्या सर्व २१ जागा लढण्यासाठी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचेही ॲड. पाटील यांनी सांगितले. १५ तालुक्यांमधून जो ही निवडणुकीत टक्कर देऊन विजयी होऊ शकतो, असे उमेदवार काँग्रेसकडे आहे. तसेच सर्वपक्षीय पॅनलबाबत कोणतीही चर्चा इतर पक्षांसोबत झाली नसल्याचीही माहिती त्यांनी दिली. रविवारी झालेली बैठक ही प्राथमिक असून, लवकरच पुढील रणनितीबाबत बैठका घेतल्या जातील अशीही माहिती ॲड. पाटील यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची केली निराशा केली - डॉ. उल्हास पाटील

जिल्हा बँकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची निराशा केली आहे. सत्ताधाऱ्यांना भक्कम पर्याय देण्यासाठीच काँग्रेसने स्वबळाची तयारी केली असल्याची माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी दिली. स्वतंत्र पॅनल तयार करून ही निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगितले. तसेच इच्छुकांसाठी काँग्रेसकडून निरीक्षक नेमले जाणार असून, निरीक्षकांकडून पडताळणी करून उमेदवार निश्चित केले जातील, अशीही माहिती डॉ. पाटील यांनी दिली.