शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आरोग्य केंद्राच्या निविदांमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : निविदा प्रक्रियेतील घोळ व प्रशासनाच्या चालढकलपणामुळे आरोग्य केंद्राचे पाच कोटी रुपये अत्यावश्यक असतानाही खर्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : निविदा प्रक्रियेतील घोळ व प्रशासनाच्या चालढकलपणामुळे आरोग्य केंद्राचे पाच कोटी रुपये अत्यावश्यक असतानाही खर्च न होता ते परत गेल्याचा मुद्दा मांडत विरोधी सदस्यांनी जि. प. स्थायी समितीच्या सभेत संताप व्यक्त केला. यासह जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवरील व्यापारी संकुलाचा विषयही या सभेत गाजला.

स्थायी समितीची सभा सोमवारी ऑनलाईन पार पडली. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. सभेत आरोग्य केंद्राच्या विषयासह दफ्तर न देणाऱ्या वरसाडे ग्रामसेवकावर कारवाई करा, अशी मागणी सदस्य मधू काटे यांनी केली. यासह आरोग्य विभागातील कालबद्ध पदोन्नत्यांचा विषय मांडण्यात आल्यानंतर येत्या आठ दिवसात ही प्रक्रिया होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

सदस्यांचा संताप

२०१९-२० मध्ये कासोदा, धारागिर, लोहारा, नगरदेवळा, रिंगणगाव या आरोग्य केंद्र व उपकेंद्राना पालकमंत्री व आमदारांच्या पाठपुराव्यानंतर पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला होता.हा निधी खर्च करण्यासाठी २०२१ च्या मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, ज्या निविदा आल्या त्या अपात्र करण्यात आल्या नंतर पात्र केल्या. निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना २० टक्के भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या. या प्रकाराने ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली, या सर्व प्रकारात व प्रशासनाच्या चालढलपणामुळे अखेर हा निधी परत गेल्याचा आरोप शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन तसेच मधू काटे यांनी केला. आता पालकमंत्री व आमदारांकडेदेखील तक्रारी करण्यात येणार असल्याचे नानाभाऊ यांनी सांगितले.

जामनेरच्या विषयावर सदस्य आक्रमक

जामनेर येथील जिल्हा परिषद मालकीच्या जागेवरील व्यापारी संकुलाबाबत आपण माध्यमांमध्ये वाचले, व्हॉटस्ॲपवर बघितले मात्र, आतापर्यंत हा विषय कुठेही, जि.प.च्या कोणत्याच सभेत पटलावर आला नाही, सदस्यांना याबाबत माहिती नाही, प्रशासनाला वसुलीबाबत काही माहिती आहे का, अशी विचारणा राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांनी केली. आम्ही आता आलोय आम्हाला माहिती नाही, अशी उत्तरे पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून आल्यानंतर मात्र, त्यांनी संताप व्यक्त केला. अल्पबचत भवनातील गाळ्यांपेक्षा हा मोठा विषय असताना यावर चर्चा का झाली नाही, अशीही विचारणा साळुंखे यांनी केली. याबाबत माहिती घेऊन देण्याचे आश्वासन अखेर अधिकाऱ्यांनी दिले. या विषयावरच पंधरा ते वीस मिनिटे चर्चा सुरू होती.