शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जळगावात राबविली जातेय ‘ग्रंथ घर’ संकल्पना

By रवींद्र.माधव.मोराणकर | Updated: November 26, 2017 18:42 IST

सर्वासाठी खुले : वाचन-लेखन करणा:यांसाठी मिळतात पुस्तके

रवींद्र मोराणकर । ऑनलाईन  लोकमत

जळगाव, दि.26 : सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयांमध्ये आपल्याला हवी ती पुस्तके मिळतात. प्रत्येक वाचनालयाचा आवाका आपापल्या ऐपतीप्रमाणे असतो. मात्र जळगाव येथील शिक्षणतज्ज्ञ तथा केसीई सोसायटीचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी आपल्याकडील ग्रंथालय हे वाचक आणि ग्रंथप्रेमींसाठी खुले करून दिले आहे. ‘ग्रंथ घर’ ही संकल्पना ते प्रत्यक्षात अमलात आणत आहेत. याचा आतार्पयत अनेक वाचकांनी, ग्रंथप्रेमींनी लाभही घेतला आहे. जळगावातील महाबळ कॉलनी परिसरातील आपल्या घराला त्यांनी एखाद्या ग्रंथालयाचेच स्वरूप दिले आहे. घराच्या तिन्ही खोल्या, आतील व शेवटच्या घरातील माळोच्यावरही त्यांनी पुस्तके ठेवलेली आहेत. मराठी साहित्यातील सर्व विषयांवरची आणि वा्मयाच्या सर्व प्रकारातील हजारो पुस्तके असल्याचे ते अभिमानाचे सांगतात. आजच्या स्थितीत त्यांच्याकडे किमान सात लाख रुपये किमतीची पुस्तकं आहेत. वाचन-लेखनाची आवड असलेल्यांनी यावं, त्यांच्यासाठी सदैव आपले ‘ग्रंथ घर’ उपलब्ध आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही. मात्र एकच अट. ग्रंथ नीटनेटके हाताळावेत, वाचून झाल्यावर ते परत करावेत. पुस्तकं घराघरात पोहचावीत वाचन संस्कृती वाढावी म्हणून नव्हे तर घराघरात पुस्तकं पोहचावीत, ती वाचली जावीत, हा प्रमुख उद्देश असल्याचं ते सांगतात. मुलगा हर्षवर्धन याच्या लग्नात सर्वाना चार पुस्तकांचा संच भेट म्हणून दिला. असे 80 संच दिले. आतार्पयत किमान दीड लाख रुपये किमतीची पुस्तकं भेट म्हणून दिली असल्याचे ते नमूद करतात. शाळांना, शिक्षकांना, विद्याथ्र्याना व पालकांना विनामूल्य पुस्तकं भेट देत असतात. फक्त वाचनाचे प्रकार बदलले मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडियामुळे वाचन कमी झाले नसून, फक्त वाचनाचे प्रकार बदलले आहेत. अलीकडे इंटरनेटवरही खूप पुस्तकं वाचली जाताहेत. मुलं ग्रंथ घर बघायला येतात, चर्चा करतात, पण शिक्षकांना तसं वाटत नाही, अशी खंतही चंद्रकांत भंडारी यांना वाटते. लिहित्या हातांना पुरवतो विषय पीएच.डी. करणा:यांना नेहमीच मदत करतो. लिहित्या हातांना वेगवेगळे विषय पुरवतो, असे 15-20 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. गरजू विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालयांना आम्ही (मी व पत्नी) पुस्तकं भेट देतो. जेणेकरून त्यांनाही विविध विषयांची पुस्तकं कळतात, चर्चा होते. विद्याथ्र्याना अभ्यास करताना प्रकल्पांसाठी या ग्रंथांचा उपयोग होतो, असे ते सांगतात. 60 वर्षीय भंडारी गेल्या 36 वर्षापासून ‘ग्रंथ घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवत आहेत. त्यांची आतार्पयत 18 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात बालवा्मय, समीक्षा, कादंबरी, पालक प्रबोधनपर पुस्तिकांचाही समावेश आहे. पुस्तकांची गोष्टीरूप ओळख करावी ‘श्यामची आई’ यशोदाबाईंचे यंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे. यानिमित्त जळगावच्या गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील शाळेत गोष्टीरूप कथा ते सांगतात. या शैक्षणिक वर्षाचा वर्षभराचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. लहान मुलांर्पयत पुस्तकं पोहोचवायचे, पण त्याआधी पुस्तकांची गोष्टीरूप ओळख करून दिली पाहिजे, गोष्ट म्हटली की, मुलं शांतपणे ऐकतात, यासाठी मुलांना अभ्यासाकडे वळते करण्यासाठी गोष्टी रूपाने त्यांना वळविता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे.