शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:22 IST

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत. घरकुलांसाठी अनुदान घेऊनही ते न पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांवर ...

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील अपूर्णावस्थेतील ४६० घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत. घरकुलांसाठी अनुदान घेऊनही ते न पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

गुरुवारी त्यांनी पं.स.मध्ये विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी त्यांना माहिती दिली. डॉ. पंकज आशिया यांनी पं. स.मध्ये सकाळी ११ ते दुपारी दोन असे तीन तास सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी विभागनिहाय कामांबाबतही सूचना दिल्या. दुपारी २.३० वाजता त्यांनी तालुक्यातील हगणदारी व डासमुक्त चैतन्यनगर तांडा या गावाला देखील अचानक भेट दिली.

यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, ग्रामसेवक संघटनेचे सचिव संजीवकुमार निकम, कैलास माळी, आर. आय. पाटील, माजी अध्यक्ष दिनकर राठोड, ग्रामपंचायत सदस्य वसंत राठोड, मंगेश राठोड, संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही त्यांनी भेट दिली.

चौकट

शाळांमध्ये नळ जोडणीची कामे पूर्ण करा

तालुक्यात जि.प.च्या १९० प्राथमिक शाळा असून यापैकी फक्त २१ शाळांमध्ये नळजोडणी आहे. उर्वरित १६९ शाळांमध्ये नळ जोडणी तात्काळ देण्यात यावी, अशा सूचना डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

१. तालुक्यातील ११० ग्रा.पं.चे जलजीवन मिशन आराखड्यांबाबतही त्यांनी माहिती घेतली. २६ ग्रा.पं.चे आराखडे तयार झाले असून उर्वरित ७४ आराखडे तयार करण्याविषयी निर्देश दिले.

२. टाकळी प्र.चा., उंबरखेडे, वाघळी या तीन गावांची माझी वसुंधरा अभियानासाठी निवड झाली असून याचेही नियोजन आराखडे तयार करण्याच्या सूचना डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.